सौजन्य - नवराष्ट्र टीम
एलपीजी टंचाईबाबत बोलताना ते म्हणाले, सध्या निर्माण झालेली परिस्थिती तात्पुरती असून, भारत सरकार आणि पेट्रोलियम मंत्रालय या प्रश्नावर लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी घाबरण्याचे कारण नसून घरगुती गॅसच्या पुरवठ्यात मोठा अडथळा येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सावंत म्हणाले की, सध्या काही भागात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवांना प्राधान्य देण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि काही व्यावसायिक क्षेत्रांमध्ये गॅस उपलब्धतेची समस्या निर्माण झाली आहे. मात्र हा प्रश्नही लवकरच मार्गी लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गॅस टंचाईचा परिणाम काही प्रमाणात पर्यटन क्षेत्रावरही होत आहे. हॉटेल आणि खाद्य व्यवसायावर त्याचा परिणाम झाल्यामुळे पर्यटन उद्योगावर अप्रत्यक्ष परिणाम जाणवत आहे. तरीही ही परिस्थिती तात्पुरती असून, पुरवठा साखळी सुरळीत करण्यासाठी केंद्र सरकारकडून आवश्यक पावले उचलली जात आहेत.
सावंत यांनी पुढे सांगितले की, अत्यावश्यक सेवा, रुग्णालये आणि सार्वजनिक सुविधा यांना गॅस पुरवठा प्राधान्याने केला जात आहे. नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर कमीत कमी परिणाम होईल यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. घरगुती गॅसच्या बाबतीत मोठी अडचण नसून साठा उपलब्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पुढील काही आठवड्यांत पुरवठा पूर्णपणे नियमित होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
हे सुद्धा वाचा : कृषी क्षेत्रासमोर नवे आव्हान! बदलत्या परिस्थितीत शेतकरी अडचणीत






