Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सरोवर बंदमुळे खरिपाच्या बियाणे योजनेत अडकले शेतकरी; मुदतवाढीची आता मागणी सुरु

ग्रामीण भागातील इंटरनेट समस्या, सीएससी केंद्रांवरील गर्दी आणि सतत बंद पडणारे पोर्टल यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 14, 2026 | 10:55 AM
सरोवर बंदमुळे खरिपाच्या बियाणे योजनेत शेतकरी अडकले; मुदतवाढीची मागणी

सरोवर बंदमुळे खरिपाच्या बियाणे योजनेत शेतकरी अडकले; मुदतवाढीची मागणी

Follow Us
Close
Follow Us:

आळेफाटा : राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना खरिप हंगामासाठी अनुदानित बियाणे उपलब्ध करून देण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे. असे असले तरी प्रत्यक्षात ऑनलाईन प्रक्रियेतील अडथळ्यांमुळे अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे. पोर्टलवर माहिती भरणे, कागदपत्रे अपलोड करणे आणि ऑनलाईन शुल्क भरणे ही प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून संबंधित पोर्टलचे सर्व्हर सतत डाऊन असल्याने अर्ज प्रक्रिया ठप्प झाली आहे.

कृषी विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पात्र शेतकऱ्यांना निश्चित मुदतीत अर्ज भरून शुल्क जमा करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेसाठी १५ मे ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांना अर्जच भरता आलेले नाहीत. ग्रामीण भागातील इंटरनेट समस्या, सीएससी केंद्रांवरील गर्दी आणि सतत बंद पडणारे पोर्टल यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः शेतीच्या हंगामाच्या तोंडावर बियाणे उपलब्ध होणे अत्यंत महत्त्वाचे असताना शासनाच्या ऑनलाईन प्रणालीतील त्रुटींमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक आणि मानसिक नुकसान होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. अनेक शेतकरी दिवसभर सेवा केंद्रांवर थांबूनही अर्ज पूर्ण करू शकले नाहीत.

विनापरवाना शेतमाल खरेदी-विक्री करणाऱ्यांवर कारवाई होणार; जयकुमार रावल

माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० तसेच महाराष्ट्र शासनाच्या ई-गव्हर्नन्स धोरणानुसार नागरिकांना ऑनलाईन सेवा अखंड आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी मानली जाते. तसेच शासनाच्या विविध परिपत्रकांमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास लाभार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी मुदतवाढ देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे या प्रकरणातही कृषी विभागाने सकारात्मक भूमिका घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

परिसरातील प्रगतशील शेतकरी शिवाजी डुंबरे यांनी राज्य शासनाकडे तातडीने अर्ज भरण्याची मुदत वाढविण्याची मागणी केली आहे.“शेतकरी मुद्दाम अर्ज भरत नाहीत असे नाही. शासनाचे पोर्टलच बंद असल्याने प्रक्रिया पूर्ण होत नाही. त्यामुळे हजारो शेतकरी लाभापासून वंचित राहू शकतात. कृषी विभागाने तत्काळ मुदतवाढ जाहीर करून सर्व्हर सुरळीत करावा,” अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, कृषी विभागाकडून अद्याप मुदतवाढीबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरी शेतकऱ्यांमधून तीव्र मागणी होत आहे. जर अंतिम मुदतीपूर्वी तांत्रिक समस्या दूर झाल्या नाहीत, तर मोठ्या प्रमाणावर शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: Farmers stranded in kharif seed scheme due to dam closure

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 10:55 AM

Topics:  

  • Farmer Issue
  • Farming News

संबंधित बातम्या

धक्कादायक ! अवघ्या चार महिन्यांत 102 शेतकऱ्यांनी केली आत्महत्या; नापिकी, कर्जबाजारीपणा ठरलं कारण
1

धक्कादायक ! अवघ्या चार महिन्यांत 102 शेतकऱ्यांनी केली आत्महत्या; नापिकी, कर्जबाजारीपणा ठरलं कारण

एसटी प्रवासातूनच महिलेचे दीड लाखाचे दागिने चोरीला; चालक-वाहकाने मदतीऐवजी महिलेला भररस्त्यातच…
2

एसटी प्रवासातूनच महिलेचे दीड लाखाचे दागिने चोरीला; चालक-वाहकाने मदतीऐवजी महिलेला भररस्त्यातच…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.