Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Enviornment: निसर्गाचा इशारा! गवताळ प्रदेशाची केवळ पुनर्स्थापना पुरेशी नाही; ‘आयसर पुणे’चे धक्कादायक संशोधन

Enviornment: पुनर्विकसित गवताळ प्रदेशांमध्ये आढळणाऱ्या वनस्पती तुलनेने अधिक उंच असल्याचे आढळले. त्यांच्या पानांमध्ये नायट्रोजनचे प्रमाण अधिक आणि पानांचे विशिष्ट क्षेत्रफळही जास्त होते. तसेच पानांमधील कोरड्या पदार्थाचे प्रमाण तुलनेने कमी होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 03, 2026 | 02:35 AM
IISER Pune studied the degradation of grasslands.

IISER Pune studied the degradation of grasslands.

Follow Us
Follow Us:
  • गवताळ प्रदेश पुन्हा हिरवागार झाला, तरी जुने रूप परतत नाही
  • पुनर्स्थापित प्रदेशांतील वनस्पती संसाधनांचा अधिक वेगाने वापर करतात
  • ७४२ प्रजातींच्या जागतिक अभ्यासातून निष्कर्ष
सुनयना सोनवणे/ पुणे: मानवी वापरासाठी जुने गवताळ प्रदेश नष्ट केल्यानंतर ते पुन्हा विकसित झाले, तरी तेथील वनस्पती समुदाय आणि त्यांच्या कार्यात्मक गुणधर्मांमध्ये झालेला बदल दीर्घकाळ कायम राहू शकतो. हा बदल शंभर वर्षांहून अधिक काळ टिकत असल्याचे जागतिक पातळीवरील अभ्यासातून समोर आले आहे. त्यामुळे गवताळ प्रदेशाची केवळ बाह्य स्वरूपातील पुनर्स्थापना झाली म्हणून त्याची मूळ जैवविविधता आणि परिसंस्थेची कार्यक्षमता पूर्णपणे पूर्ववत होतेच असे नाही, असे या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. जुने, नैसर्गिक गवताळ प्रदेश हजारो वर्षांच्या कालावधीत विकसित झालेले असतात. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जैवविविधता आढळते, तसेच मातीची सुपीकता, पोषकद्रव्यांचे चक्र, कार्बन साठवण आणि इतर अनेक परिसंस्था सेवा यामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा असतो. मात्र शेती, लाकूड उत्पादन आणि खनिज उत्खननासाठी अशा प्रदेशांचा मोठ्या प्रमाणावर नाश होत आहे. त्यामुळे जागतिक जैवविविधतेच्या संकटात गवताळ प्रदेशांचा ऱ्हास हा महत्त्वाचा घटक ठरत आहे.

या पार्श्वभूमीवर आयसर पुणे येथील आशिष एन. नेर्लेकर, आंद्रे गाइल्स, नॉर्बर्ट हॉल्झेल, लार्स ए. ब्रुडविग यांच्यासह संशोधकांनी हा अभ्यास केला. सहा खंडांमधील २४ संशोधनांमधून ७४२ वनस्पती प्रजातींची माहिती एकत्रित करून त्यांचे विश्लेषण करण्यात आले. जुन्या गवताळ प्रदेशांतील आणि नष्ट झाल्यानंतर पुन्हा विकसित होणाऱ्या गवताळ प्रदेशांतील वनस्पतींच्या कार्यात्मक गुणधर्मांची तुलना करण्यात आली.

Manori Water Treatment Project: मनोरी जलशुद्धीकरण प्रकल्पाला मच्छीमारांचा तीव्र विरोध; ‘हजारो कुटुंबांच्या रोजगारावर संकट’

संसाधने मिळविण्यावर अधिक भर

पुनर्विकसित गवताळ प्रदेशांमध्ये आढळणाऱ्या वनस्पती तुलनेने अधिक उंच असल्याचे आढळले. त्यांच्या पानांमध्ये नायट्रोजनचे प्रमाण अधिक आणि पानांचे विशिष्ट क्षेत्रफळही जास्त होते. तसेच पानांमधील कोरड्या पदार्थाचे प्रमाण तुलनेने कमी होते. हे सर्व गुणधर्म वनस्पतींना सूर्यप्रकाश, पाणी आणि मातीतील पोषकद्रव्ये वेगाने मिळवून घेण्यास आणि त्याद्वारे जलद वाढ करण्यास मदत करतात. याउलट जुन्या गवताळ प्रदेशांतील वनस्पती संसाधनांचा अधिक काटकसरीने वापर करणाऱ्या आढळल्या. त्या तुलनेने कमी संसाधनांमध्ये टिकून राहण्यास अनुकूल झालेल्या असतात. त्यामुळे दोन्ही प्रकारच्या गवताळ प्रदेशांमध्ये वनस्पतींच्या रचनेबरोबरच परिसंस्थेच्या कार्यपद्धतीतही फरक निर्माण होऊ शकतो.

बदल केवळ काही वर्षांपुरते मर्यादित नाहीत

अभ्यासातील सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष म्हणजे वनस्पतींच्या या गुणधर्मांमधील फरक काही दशकांपुरता मर्यादित नसून शंभर वर्षांहून अधिक काळ टिकू शकतो. त्यामुळे एखादा गवताळ प्रदेश नष्ट झाल्यानंतर पुन्हा गवत आणि इतर वनस्पती वाढू लागल्या, तरी त्याची मूळ कार्यात्मक वैशिष्ट्ये तातडीने परत येत नाहीत. या बदलांमुळे पोषकद्रव्यांचे चक्र अधिक वेगाने होण्याची शक्यता आहे. परिणामी पुनर्स्थापित गवताळ प्रदेशांची परिसंस्थात्मक कार्यपद्धती मूळ, जुन्या गवताळ प्रदेशांपेक्षा वेगळी राहू शकते.

आई शप्पथ! 23% पावसाचे थेंब जमिनीवर पोहोचण्याआधीच…; ‘ IITM ‘च्या संशोधनातून निष्कर्ष

संवर्धनाला अधिक महत्त्व 
गवताळ प्रदेशांच्या पुनर्स्थापनेसाठी या निष्कर्षांचा उपयोग होऊ शकतो. पुनर्स्थापना करताना केवळ वनस्पतींची संख्या किंवा हिरवाई वाढविण्याऐवजी जुन्या गवताळ प्रदेशातील विशिष्ट वनस्पती प्रजाती, त्यांचे गुणधर्म आणि परिसंस्थेतील त्यांची भूमिका यांचा विचार करणे आवश्यक असल्याचे अभ्यासातून सूचित होते. जुने गवताळ प्रदेश नष्ट झाल्यानंतर त्यांची जैवविविधता आणि वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती समुदाय पुन्हा निर्माण होण्यास मोठा कालावधी लागू शकतो. त्यामुळे नष्ट झालेल्या गवताळ प्रदेशांच्या पुनर्स्थापनेइतकेच उर्वरित जुन्या गवताळ प्रदेशांचे थेट संवर्धन करणे अधिक प्रभावी ठरू शकते.

Web Title: Iiser pune research grassland degradation restoration biodiversity loss ecosystem recovery

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • environment
  • navarashtra special
  • pune news

संबंधित बातम्या

अभिमानास्पद क्षण! प्रा. विलास कथुरे यांचा ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कारा’ने सन्मान
1

अभिमानास्पद क्षण! प्रा. विलास कथुरे यांचा ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कारा’ने सन्मान

‘माझ्या राजीनाम्याची मागणी केली…’; MPSC पेपर फूटीवरून अध्यक्ष विवेक भीमनवार काय म्हणाले?
2

‘माझ्या राजीनाम्याची मागणी केली…’; MPSC पेपर फूटीवरून अध्यक्ष विवेक भीमनवार काय म्हणाले?

Sportsfield Monsoon League: विजय ॲकॅडमीची हॅटट्रिक, तर इकोल स्पोर्ट्सची विजयी घोडदौड कायम
3

Sportsfield Monsoon League: विजय ॲकॅडमीची हॅटट्रिक, तर इकोल स्पोर्ट्सची विजयी घोडदौड कायम

National Live Fearless Day : मनातल्या भीतीवर मात करून जगा निर्भय आयुष्य; जाणून घ्या ‘या’ खास दिवसाचा काय आहे उद्देश?
4

National Live Fearless Day : मनातल्या भीतीवर मात करून जगा निर्भय आयुष्य; जाणून घ्या ‘या’ खास दिवसाचा काय आहे उद्देश?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.