
युरेका! LPG ला पर्याय सापडला! पुण्यनगरीत शास्त्रज्ञांनी केली कमाल; तयार केला 'हा' जबरदस्त गॅस
एलपीजीला पर्याय ठरेल अशा वायूचा शोध लावण्यात यश
एनसीएलचे शास्त्रज्ञ डॉ. तिरूमलाईस्वामी राजा यांचं मोठं संशोधन
व्यावसायिक वापरासाठी डीएमई गॅसचं उत्पादन करण्यात यश
Pune News: सध्या देशभरात इराण इस्त्रायल युद्धामुळे एलपीजी गॅसचा तुटवडा असल्याचे समोर येत आहे. दरम्यान केंद्र सरकारने याबाबत कोणताही तुटवडा नसल्याचे स्पष्ट केले आहे. अंतर ग्राहकांनी गॅस सिलेंडरसाठी केंद्रांवर एकच गर्दी केली आहे. एलपीजी गॅस नसल्याने त्याचा फटका हॉटेल, कारखाने, मेस यांना बसत आहे. असे असतानाच पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमधील शास्त्रज्ञांनी एलपीजीला पर्याय ठरू शकेल असे डायमिथाइल अ डीमई (DME) गॅसची निर्मिती करण्यात यश मिळवले असल्याचे समोर येत आहे.
पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमधील डॉक्टर तिरूमलाईवामी राजा आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या टीमने गेले 20 वर्ष प्रचंड मेहनत करून हा गॅस तयार करण्यात यश मिळाले आहे. हा गॅस तयार करण्यासाठी आवश्यक असणारे उत्पेरक प्रयोगशाळेत तयार करण्यात यश मिळवले आहे.
स्वयंपाकघर सध्या अडचणींच्या भोवऱ्यात? LPG चा तुटवडा अन् उद्योगधंद्यावरही परिणाम
हा प्रयोग आता केवळ कागदावर नसून आता रोज 250 किलो ‘डीएमई’वायूचे उत्पादन केले जात आहे. या गॅसचे उत्पादन झाल्यास एलपीजी गॅसमध्ये 8 टक्के हा गॅस मिसळता येणार आहे. यामुळे एलपीजीवर दुसऱ्या देशांवर अवलंबून राहण्याची गरज मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.
या डीएमई गॅसचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्यास त्याची किंमत एलपीजी पेक्षा कमी असेल असा विश्वास शास्त्रज्ञांनी व्यक्त केला. पुण्यात तयार करण्यात आलेला हा वायु पूर्णपणे स्वदेशी आहे. आता मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यासाठी औद्योगिक कंपन्यांशी करार करण्याबाबत चर्चा सुरू आहे.
Ratnagiri News: ग्राहकांनो…; रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी LPG बाबत केले ‘हे’ आवाहन
स्वयंपाकघर सध्या अडचणींच्या भोवऱ्यात?
अखेर, गॅस संकटामुळे, केंद्र सरकारला आवश्यक वस्तू देखभाल कायदा (ESMA) लागू करावा लागला. भारतात इंधनाच्या प्रश्नावर चिंता पसरली आहे. इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी वाहतूक रोखली आहे, जी जगातील २० टक्के इंधनाची वाहतूक करते. सौदी अरेबिया, इराण, इराक, कुवेत, कतार आणि युएई येथून भारत, चीन, जपान आणि दक्षिण कोरियाला होणारा कच्च्या तेलाचा आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा या सामुद्रधुनीतून थांबवण्यात आला आहे. येथून ८४ टक्के तेल आशियाई बाजारपेठेत पोहोचते. या अडथळ्यामुळे एलपीजी आणि एलएनजीचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. जर लवकरच यावर उपाय शोधला गेला नाही तर त्याचा परिणाम प्रत्येक स्वयंपाकघरावर होईल. भारताला त्याच्या एलपीजी (स्वयंपाकाचा गॅस) पैकी 90 टक्के भाग आखाती देशांमधून मिळतो.