
Purandar Airport, Land Acquisition, Jitendra Dudi, Pune News, Farmer Protest,
पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, पारगाव, मुंजवडी, खानवडी अशा सात गावांमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प उभारण्यात येणार असून यासाठी जमिनीचे भूसंपादन करण्यात येत आहे. त्यासाठी १२८५ हेक्टर म्हणजे तीन हजार एकर क्षेत्रावर विमान तळ प्रकल्प उभारण्याचे निश्चित करून पहिल्या टप्प्यात ३००० एकर क्षेत्र संपादित करण्याचे जाहीर करून तेवढ्या क्षेत्राची प्रत्यक्षात मोजणी करण्यात आली आहे.
Eknath Shinde Shivsena News: एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; बडा नेता साथ सोडण्याच्या तयारीत
मागील दोन दिवसापूर्वी जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी शेतकऱ्यांना एकरी किती भाव देणार हे जाहीर केले. त्यानंतर लगेचच भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात केली. त्यानंतर पहिल्याच दिवशी तब्बल ४५० एकर जमिनीचे भूसंपादन झाले. ७ मे पासून १० जून पर्यंत संमती करारनामा तर १० जून नंतर सक्तीने भूसंपादन करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी दुडी यांनी जाहीर केले आहे. त्यादृष्टीने शासनाकडून अत्यंत वेगाने प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
विमानतळ जागेचे भूसंपादन होत असताना शेकडो शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात रांगा लावल्याचे सांगितले जात आहे. वास्तविक पाहता प्रत्यक्षात ज्या गुंतवणूकदारांनी जमिनी काही लाखात खरेदी केलेले गुंतवणूकदार आता कोट्यावधी रुपयांच्या लालसेने रांगा लावत असल्याचे पाहायला मिळत आहे. केवळ गुंतवणूकदार शेतकऱ्यांच्या पुढाकारानेच भूसंपादन प्रक्रिया अत्यंत वेगात सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.
New rules: आता वीज महागणार? नियमांचे उल्लंघन केल्यास भरावा लागणार मोठा दंड
एकीकडे जिल्हाधिकारी कार्यालयकडून विमानतळ जागेचे भूसंपादन प्रक्रिया वेगाने सुरु आहे तर दुसऱ्या बाजूला स्थानिक सातही गावातील शेतकऱ्यांनी आपला तीव्र विरोध पुन्हा एकदा जाहीर केला आहे. आम्हाला कोणताही मोबदला नको, आम्हाला आमची जमीन पाहिजे, शासनाने या साठी आमच्यावर जबरदस्ती करू नये. आम्हाला पुन्हा आंदोलन करायला भाग पाडू नये असा इशाराच शेतकऱ्यांनी शासनाला दिला आहे.