
राज्यातील टीईटी पेपर लीकवरून राहुल गांधी आक्रमक! मुख्यमंत्री फडणवीसांसमोर ठेवल्या 'या' ३ मागण्या (Photo Credit- X)
पेपरफुटीमुळे महाराष्ट्र TET परीक्षा रद्द झाल्यानंतर नवीन तारीख जाहीर करण्यास होत असलेल्या विलंबाबद्दल काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी चिंता व्यक्त केली. त्यांनी मागणी केली की, नवीन तारीख त्वरित जाहीर करावी आणि बाधित उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत द्यावी. त्यांनी पुढे आरोप केला की, पेपरफुटी ही यंत्रणेची अपयश असतानाही, प्रामाणिकपणे तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांना त्याची किंमत मोजावी लागत आहे.
महाराष्ट्र TET का पेपर लीक हुआ, परीक्षा रद्द हुई। 6 लाख अभ्यर्थी अधर में। दो हफ्ते हो गए, नई तारीख़ का कोई अता-पता नहीं। लीक करने वाले आज़ाद, सिस्टम बेदाग़ और सज़ा भुगत रहा है वो जिसने ईमानदारी से मेहनत की। ये देश के कार्यरत और होने वाले शिक्षक हैं जिनके हाथ में भारत का भविष्य… — Rahul Gandhi (@RahulGandhi) July 14, 2026
‘एक्स’वरील आपल्या पोस्टमध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी लिहिले की, महाराष्ट्र TET चा पेपर फुटला आणि परीक्षा रद्द झाली. ६ लाख उमेदवारांचे भवितव्य अधांतरी लटकले आहे. दोन आठवडे उलटूनही नवीन तारखेचा काहीच पत्ता नाही.
वेळापत्रक: TET परीक्षेची नवीन तारीख त्वरित जाहीर करा.
जबाबदारी: पेपरफुटीस जबाबदार असलेल्यांवर कारवाई झाली पाहिजे, उमेदवारांवर नाही.
भविष्याचे रक्षण: या पेपरफुटीमुळे ज्या उमेदवारांचे वर्ष वाया गेले, त्यांना वयोमर्यादेत सवलत दिली जावी.
महाराष्ट्र TET पेपरफुटीच्या प्रकरणावरून सरकारवर निशाणा साधताना राहुल गांधींनी लिहिले की, ज्यांनी पेपर फोडला ते मोकाट फिरत आहेत आणि यंत्रणा सुरक्षित आहे, तर शिक्षा मात्र प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्यांना भोगावी लागत आहे. हे देशातील कार्यरत आणि भावी शिक्षक आहेत, ज्यांच्या हातात भारताचे भवितव्य आहे. हे तेच लोक आहेत ज्यांनी वर्षानुवर्षे तयारी केली, अर्ज भरले, शुल्क भरले आणि दूरवरच्या परीक्षा केंद्रांपर्यंत प्रवास केला. आणि आता, ते केवळ वाट पाहत आहेत कोणतीही निश्चित तारीख नाही किंवा ठोस उत्तरही नाही. चूक संबंधित संस्थेची आहे, तरीही त्याचे परिणाम मात्र उमेदवारांना भोगावे लागत आहेत. हा न्याय नाही.
राहुल गांधी यांनी एका पोस्टद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी लिहिले की, १७ जुलै रोजी डेहराडून येथे ते पेपरफुटीच्या वाढत्या संकटाबाबत विद्यार्थ्यांशी सविस्तर चर्चा करतील. आता शैक्षणिक क्रांतीची वेळ आली आहे अशी व्यवस्था निर्माण करण्याची वेळ, जिथे तरुणांना व्यवस्थेच्या अपयशाचे परिणाम भोगावे लागण्याऐवजी त्यांच्या कठोर परिश्रमांचे फळ मिळेल.