UGC-NET पेपर लीकवरून राहुल गांधींचा आक्रमक हल्ला (Photo Credit- X)
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘एक्स’वर पोस्ट केले, “NEET परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर अवघ्या काही आठवड्यांतच, आता अशी माहिती समोर येत आहे की UGC-NET परीक्षेपूर्वीच १०० पानांची एक PDF लीक झाली होती. ही PDF केवळ NTA (नॅशनल टेस्टिंग एजन्सी) कडे उपलब्ध असलेल्या प्रश्नपत्रिकेशी मिळतीजुळती आहे. या PDF मधील सुमारे ९० प्रश्न प्रत्यक्ष ‘समाजशास्त्र’ (Sociology) विषयाच्या प्रश्नपत्रिकेशी जुळतात. तीच प्रश्नपत्रिका बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली आणि राजस्थानमध्ये २.२५ लाख रुपयांना विकली जात होती. याच नेटवर्कने CSIR-NET, HTET आणि ADA सारख्या आगामी परीक्षांच्या प्रश्नपत्रिकाही उपलब्ध करून देऊ शकतो, असा दावा केला होता.
पिछले सप्ताह हुई UGC-NET परीक्षा को लेकर सामने आए गंभीर आरोप बेहद चौंकाने वाले हैं। NEET पेपर लीक के कुछ ही हफ्तों बाद अब खबरें आ रही हैं कि – – UGC-NET परीक्षा से ठीक पहले 100 पन्नों की एक PDF प्रसारित हुई।
– यह PDF उस question paper setting की है, जो सिर्फ़ NTA के पास उपलब्ध… pic.twitter.com/16hyeGaAlT — Rahul Gandhi (@RahulGandhi) July 8, 2026
NEET आणि NET परीक्षांशी संबंधित वारंवार होणाऱ्या घोटाळ्यांकडे मोदी सरकार डोळेझाक करून गाढ झोपेत आहे; लाखो विद्यार्थ्यांनी अनेक रात्री जागून केलेल्या कठोर परिश्रमांची त्यांना काहीच पर्वा नाही. पंतप्रधान आणि शिक्षण मंत्र्यांकडून कोणत्याही प्रकारची उत्तरदायित्वाची अपेक्षा करणे किंवा कारवाईची अपेक्षा करणे व्यर्थ आहे, हे संपूर्ण देशाला माहित आहे. याची कोणतीही चौकशी होणार नाही आणि विद्यार्थ्यांना न्यायही मिळणार नाही. बदलासाठी आपला सामूहिक आवाज हेच एकमेव साधन आहे देशभरातील विद्यार्थ्यांचा तो बुलंद आवाज, जो भारतात नक्कीच शैक्षणिक क्रांती घडवून आणेल.”
NEET परीक्षेनंतर निर्माण झालेल्या वादाचा संदर्भ देत, राहुल गांधींनी केंद्र सरकारवर स्पर्धा परीक्षांची विश्वासार्हता राखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला. पेपर फुटल्याचे वारंवार आरोप होऊनही सरकार काहीच करत नाही, असे त्यांनी म्हटले. राहुल गांधींनी ‘एक्स’वर पोस्ट केले, “NEET आणि NET परीक्षांशी संबंधित वारंवार होणाऱ्या घोटाळ्यांकडे मोदी सरकार दुर्लक्ष करत आहे आणि गाढ झोपेत आहे.”
यापूर्वी, टेलिग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर NEET परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर मोठा गदारोळ झाला होता. मूळची परीक्षा रद्द करण्यात आली आणि तपास CBI कडे सोपवण्यात आला. या प्रकरणात आतापर्यंत अनेक जणांना अटक करण्यात आली आहे. कडक सुरक्षा व्यवस्थेत २१ जून रोजी पुन्हा परीक्षा घेण्यात आली. तेव्हापासून विरोधी पक्ष शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.
Rahul Gandhi Education: राहुल गांधी किती शिकलेत? जाणून घ्या त्यांचा शैक्षणिक प्रवास एका क्लिकवर…






