
माथेरान नगरपरिषदेला आली जाग! शार्लोट लेकमधील गाळ काढण्यासाठी लावले मजूर
माथेरान: माथेरान शहरातील नागरिकांसाठी पिण्याचे पाणी मिळावे म्हणून ब्रिटिशांनी धरण बांधले. त्या शार्लोट लेक या धरणातील पाणी ठेकेदाराला फायदा व्हावा म्हणून सोडून देण्यात आले.त्यानंतर प्रचंड वादंग निर्माण झाला असून अखेर माथेरान नगरपरिषदेला जाग आली आहे. पालिकेने नेमलेली ठेकेदाराने आता मनुष्यबळ वापरून जुन्या प्रथेनुसार तलावातील माती काढण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान,काल पासून 50 मजूर गाळ काढण्याचे काम करीत असून पाणी कशासाठी सोडले आणि विना परवाना पाणी सोडणाऱ्यावर शासन कोणती कारवाई करणार आहे? असा संतप्त सवाल माथेरानचे माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांनी उपस्थित केला आहे.
माथेरान पालिकेच्या मालकीचे शार्लोट लेक मधील गाळ काढण्याचे काम सुरू आहे.या लेक मधील पाण्याची मालकी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडे आहे. असे असताना माथेरान पालिकेने धरणातील पाणी सोडल्यावर माती गाळ वाहून जाईल या हेतूने धरणातील पाणी 10 ऑगस्ट रोजी सोडून दिले.धरणातील माती वाहून गेली की धरणाचे ठेका घेणाऱ्या ठेकेदाराचा फायदा होणार होता. धरणातील पाणी सोडले पण धरणातील माती हवी तेवढ्या प्रमाणात वाहून गेली नाही आणि माथेरान नगरपरिषदेचा पाणी सोडण्याचा प्रयोग फसला आहे. धरणात माती तशीच राहिल्याने आणि तशीच राहिली आहे.त्यामुळे झोपेचे सोंग घेतलेली माथेरान नगरपरिषद जागी झाली आहे. 2013 पूर्वी पूर्वापार प्रमाणे माथेरान मध्ये शार्लोट लेक मधील पाणी कमी झाल्यावर लेक मधील गाळ मनुष्यबळ वापरून काढला जात होता.
मात्र 2013 माथेरानचे शार्लोट लेक मधील गाळ काढण्यात आला नसल्याने हा गाळ काढण्यासाठी केंद्र सरकारने पाच कोटींचा निधी मंजूर केला आहे.धरणातील पाण्यासोबत गाळ वाहून जाईल म्हणून धरणातील पाणी सोडले मात्र गाळ आहे तसाच आहे.ही बाब लक्षात आल्यानंतर आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष यांनी गंभीर दखल घेतली.त्यानंतर जिल्हा प्रशासनाने नगरपरिषदेला जाब विचारला आणि त्यामुळे माथेरान नगरपरिषदेला खडबडून जाग आली.शेवटी माथेरान पालिकेने ठेकेदाराला आदेश देत मनुष्यबळ वापरून गाळ काढण्यास सुरुवात झाली आहे. काल पासून शार्लोट लेक मध्ये 50 ते 60 मजूर गाळ काढण्यात व्यस्त आहेत.त्यामुळे पुन्हा एकदा येरे माझ्या मागल्या असे म्हणण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.
सध्या पावसाळा सुरू असल्याने मनुष्यबळ वापरून काढला जाणारा गाळ यांच्यात अडचणी येऊ शकतात.जानेवारी महिन्यापासून गाळ काढण्यात आला असता तर मे अखेर पर्यंत गाळ धरण गालमुक्त होऊ शकले असते.
जानेवारी 2026 मध्ये गाळ काढण्याचे पैसे काढले गेले,तो गाळ त्यावेळी काढला असता तर आता माथेरान पालिकेला मनुष्यबळ वापरून गाळ काढण्याची वेळ आली नसती. त्यामुळे ऐन पावसाळ्यात पाणी सोडून गाळ काढण्याची वेळ माथेरान पालिकेवर आली आहे.याला जबाबदार असलेली व्यक्ती आणि संस्था यांची चौकशी करून कार्यवाही करावी, अशी मागणी माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांनी केली.
Matheran News : माथेरानच्या शार्लोट तलावात कोट्यवधींचा गैरव्यवहार? गाळ न काढताच निधी लाटण्याचा आरोप