Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मनसेच्या राजू पाटलांनी सांगितले अन् मुख्यमंत्री शिंदे यांनी ऐकलं; दोघांत नेमकं काय चर्चा झाली?

डोंबिवली पूर्वेकडील प्रीमियर ग्राऊंड येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विशेष उपस्थिती होती. तर कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील हे सुद्धा यावेळी व्यासपीठावर होते.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 03, 2024 | 09:17 PM
मनसेच्या राजू पाटलांनी सांगितले अन् मुख्यमंत्री शिंदे यांनी ऐकलं; दोघांत नेमकं काय चर्चा झाली?
Follow Us
Close
Follow Us:

डोंबिवली : कल्याण डोंबिवली शहरातील विविध विकासकामांचा आज भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी डोंबिवली पूर्वेकडील प्रीमियर ग्राऊंड येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विशेष उपस्थिती होती. तर कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील हे सुद्धा यावेळी व्यासपीठावर होते.

कार्यक्रमाच्या दरम्यान पाटील आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यामध्ये चर्चा सुरू होती. त्यामुळे पाटील यांनी नेमकी शिंदेंना काय विनंती केली असावी ? असा प्रश्न माध्यमांनी राजू पाटील यांना विचारला. यावर पाटील यांनी नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्यात येणार असलेल्या 14 गावांबद्दल आणि कल्याण शीळ रोडमध्ये बाधित होत असलेल्या नागरिकांबद्दल निर्णय घेऊन तो आपल्या भाषणात जाहिर करावा अशी विनंती केली. या विनंतीला मान देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट आपल्या भाषणात यासंदर्भात घोषणा करून टाकली. त्यामुळे पुन्हा एकदा मनसेच्या राजू पाटलांनी सांगितलं आणि शिंदेंनी ऐकलं याचा प्रत्यय आला.

कोणती लोकसभा लढवायची, कशी लढवायाची याचा सर्व निर्णय राज ठाकरे घेतील. मात्र स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांची कशी तयारी आहे याबाबत राज ठाकरे यांनी आढावा घेतला असं पाटील म्हणाले. मात्र कल्याण ग्रामीण मध्ये मनसेची ताकद जास्त आहे असं सांगत मोदी लाटेतही मनसेला चांगलं मतदान झालं होतं असंही ते आवर्जून म्हणाले. कार्यकर्त्यांच राजू दादा म्हणून माझ्याबद्दल एक आपुलकी प्रेम आहे म्हणून त्यांच्याकडून मीखासदार व्हावं अशी इच्छा व्यक्त केली जाते मात्र यासंदर्भात शेवटी पक्ष निर्णय घेईल,अस देखील ते म्हणाले.

गेल्या काही दिवसांत राजू पाटील आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे हे काही कार्यक्रमादरम्यान एकत्र दिसले. त्यामुळे हे महायुतीत सामील होण्याचे तर संकेत नाही ना? असा प्रश्नही माध्यमांनी पाटील यांना विचारला यावर निवडणूका आल्या की भूमीपूजनांची संख्या वाढते आणि स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून मी जातो, त्यामुळे यातुन कोणी गैर अर्थ काढू नये, असं पाटील म्हणाले

शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे बॅनर देखील मनसेकडून लावण्यात आले होते याबद्दल बोलताना पाटील म्हणाले की, हा कार्यक्रम माझ्या विधानसभा मतदारसंघात होता त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत या योजना पोहचाव्यात आणि या कार्यक्रमाचा प्रचार व्हावा म्हणून बॅनर लावण्यात आले असं स्पष्टीकरण पाटील यांनी दिलं.

Web Title: Raju patal of mns said and chief minister shinde listened what exactly was discussed between the two nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2024 | 09:17 PM

Topics:  

  • Chief Minister Eknath Shinde
  • cmomaharashtra
  • kalyan
  • mns raju patil

संबंधित बातम्या

Kalyan Crime: घरातून सोनेसह दोन बहिणी गायब! लव जिहाद केल्याचा संशय, मात्र सत्य वेगळच; नेमकं प्रकरण काय?
1

Kalyan Crime: घरातून सोनेसह दोन बहिणी गायब! लव जिहाद केल्याचा संशय, मात्र सत्य वेगळच; नेमकं प्रकरण काय?

KDMC : पीएनटी कॉलनीत पाणी टंचाईविरोधात केडीएमसीवर मोर्चा, निवडणुका संपताच पाणीपुरवठा बंद झाल्याचा आरोप
2

KDMC : पीएनटी कॉलनीत पाणी टंचाईविरोधात केडीएमसीवर मोर्चा, निवडणुका संपताच पाणीपुरवठा बंद झाल्याचा आरोप

Kalyan crime: ‘आमच्याकडे काय बघतोस?’ म्हणत विद्यार्थ्यावर प्राणघातक चाकूहल्ला; परिसरात दहशत
3

Kalyan crime: ‘आमच्याकडे काय बघतोस?’ म्हणत विद्यार्थ्यावर प्राणघातक चाकूहल्ला; परिसरात दहशत

Kalyan Crime: आई-बाबा यापुढे मी…; बारावीच्या परीक्षेच्या भीतीने विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल
4

Kalyan Crime: आई-बाबा यापुढे मी…; बारावीच्या परीक्षेच्या भीतीने विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.