
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
काही दिवसांपूर्वी पेंद्याभाई जामिनावर बाहेर आला होता. चार महिन्यात त्याचं लग्न होणार होतं. हल्लेखोर आले आणि थेट पेंद्याभाईच्या प्रेयसीसमोर १६ वार केले.
यात तो रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळला. त्यांनतर हल्लेखोरांनी त्याच्या प्रेयसीवरही चाकूने वार करत गंभीर जखमी केले. या हत्याकांडानंतर मानपाडा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नाआधीच पेंद्याभाईचा खेळ खल्लास करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
Satara News : पैशाच्या व्यवहारातून पेरले येथे गोळीबार; दोन्ही पायांना गोळ्या लागल्याने एकजण गंभीर
पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असून घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असल्याचं समोर आल्यानंतर गुन्हे शाखेने सापळा रचून गुप्त माहितीच्या आधारे तीन आरोपींना अटक केली. अविनाश लल्लन झा, कल्पेश मढवी आणि करण गायकवाड अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून आणखी एका आरोपीचा शोध सुरू आहे. जुन्या वादातून ही हत्या झाल्याचे समोर आले आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहे.
कल्याणमध्ये खळबळ! सामाजिक कार्यकर्त्यांकडून महिलेसोबत गैरवर्तन? खडकपाडा पोलिसांत गुन्हा; आरोप फेटाळत बदनामीचा दावा
कल्याणमध्ये एका महिलेने दोन सामाजिक कार्यकर्त्यांविरोधात मारहाण आणि गैरवर्तनाचे गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस विविध अंगांनी तपास करत आहेत. दरम्यान, संबंधित सामाजिक कार्यकर्त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावत हे प्रकरण बदनामी करण्यासाठी रचलेला कट असल्याचा दावा केला आहे. तक्रारीच्या आधारे खडकपाडा पोलीस ठाण्यात संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस घटनास्थळावरील परिस्थिती, संबंधित व्यक्तींचे जबाब तसेच उपलब्ध पुराव्यांच्या आधारे या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
Ans: कल्याण पूर्वेतील आडीवली परिसरात.
Ans: तीन आरोपींना अटक करण्यात आली.
Ans: जुन्या वादातून हत्या झाल्याचे तपासात समोर आले.