Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri मधून लवकरच टेकऑफ होणार? ‘मे’ महिन्यात लोकार्पण? वाचा सविस्तर…

मुंबई ते रत्नागिरी ३२६ किलोमीटर अंतर असून रस्तेमार्गाने यासाठी ७ ते ८ तास लागतात. त्यातही मुंबई गोवा महामार्गाच्या अपूर्ण कामामुळे प्रवासाचा वेळ अधिक वाढतो.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 25, 2026 | 09:52 PM
Ratnagiri मधून लवकरच टेकऑफ होणार? ‘मे’ महिन्यात लोकार्पण? वाचा सविस्तर…
Follow Us
Close
Follow Us:

रत्नागिरीतून लवकरच टेकऑफ होणार
अनेक दशकांचे स्वप्न साकारणार
विमानतळ प्रकल्प अंतिम टप्यात

रत्नागिरी: रत्नागिरीकरांचे अनेक दशकांचे स्वप्न आता वास्तवात उतरण्याच्या उंबरठ्यावर आहे. कोकणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा रत्नागिरी विमानतळ प्रकल्प आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, येत्या मे २०२६ मध्ये रत्नागिरीच्या आकाशात विमानांची घरघर ऐकू येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासकीय पातळीवर आणि प्रत्यक्ष घटनास्थळी सुरू असलेला कामाचा वेग पाहता हा प्रकल्प रत्नागिरीच्या अर्थव्यवस्थेला नवी उंची देणारा ठरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मे महिन्यामध्ये इमारतीचा लोकार्पण सोहळा होईल, अशी माहिती या आधीच पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.

मुंबई ते रत्नागिरी ३२६ किलोमीटर अंतर असून रस्तेमार्गाने यासाठी ७ ते ८ तास लागतात. त्यातही मुंबई गोवा महामार्गाच्या अपूर्ण कामामुळे प्रवासाचा वेळ अधिक वाढतो. मात्र रत्नागिरीत विमानतळ सुरू झाल्यानंतर प्रवाशांना एका तासाच्या आत रत्नागिरीत पोहोचता येणार आहे. त्यामुळे आता रत्नागिरीकरांना मे महिन्यात झेपवणाऱ्या विमानांची प्रतीक्षा आहे… प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी मनुष्यबळाचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

Noida International Airport: नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळाला एअरोड्रम परवाना; लवकरच सुरू होणार उड्डाणे

सुमारे २०० निष्णात कामगार आणि २० अनुभवी अभियंते दोन पाळ्यांमध्ये काम करत आहेत. कामाचा दर्जा आणि गुणवत्ता राखण्यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. तीन महिन्यांपूर्वीच विमानतळाच्या कामाच्या प्रगतीची पाहणी पालकमंत्री तथा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांसह केली होती. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले होते की कामाचा वेग कंत्राटदाराने अशा पद्धतीने ठेवावा येत्या मे महिन्यात रत्नागिरीच्या या विमानतळावरून विमाने झेपावतील.

प्रकल्प पूर्ण होण्यासाठी पालकमंत्रा सामंत यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला आहे. त्यामुळेच टर्मिनलचे संपूर्ण कामा एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण होऊन मे महिन्यातच रत्नागिरी येथून विमाने विविध शहरांकडे जाण्यासाठी आकाशात झेपा घेतील, असे चित्र निर्माण झाले आहे. प्रशासनाच्या नियोजनानुसार, एप्रिल अखेरपर्यंत सर्व तांत्रिक आणि बांधकामा प्रक्रिया पूर्ण करून मे महिन्यात पहिले व्यावसायिक उड्डाण करण्याचे उद्दिष्ट आहे. यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये सध्या कमालीच्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

राम नवमीचा मुहूर्तावर ‘या’ आंतरराष्ट्रीय विमानतळा’चे होणार उद्घाटन; पंतप्रधान मोदी करणार लोकार्पण

नामांकित कंपन्यांकडे विविध कामांचे विभाजन
प्रकल्पाची जटिलता लक्षात घेऊन शासनाने कामाचे विभाजन विविध नामांकित कंपन्यांमध्ये केले आहे. मुख्य इमारत काम ‘न्याती कंपनी’कडे सोपवण्यात आले आहे. विमानतळाच्या अंतर्गत रस्त्यांची जबाबदारी एस. एस. पाटील कंपनीकडे आहे. सध्या रस्त्यांचे सपाटीकरण वेगाने सुरू असून, लवकरच डांबरीकरणाचा अंतिम थर टाकला जाणार आहे.

Web Title: An airport is likely to open in ratnagiri soon fadnavis shinde uday samant

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 09:52 PM

Topics:  

  • airport
  • DCM Devendra Fadnavis
  • Ratnagiri

संबंधित बातम्या

Airport Recruitment 2026: विमानतळावर नोकरीची सुवर्णसंधी! ‘AAICLAS’ मध्ये २२० जागांसाठी मेगा भरती; फ्रेशर्सनाही सुवर्णसंधी
1

Airport Recruitment 2026: विमानतळावर नोकरीची सुवर्णसंधी! ‘AAICLAS’ मध्ये २२० जागांसाठी मेगा भरती; फ्रेशर्सनाही सुवर्णसंधी

Ratnagiri : दोन महिने रिक्षा व्यावसायिकांसाठी सुगी मात्र CNG तुटवड्याने व्यवसायावर गदा
2

Ratnagiri : दोन महिने रिक्षा व्यावसायिकांसाठी सुगी मात्र CNG तुटवड्याने व्यवसायावर गदा

“… संस्था सुरु करण्यास परवानगी दिली जाणार नाही”; नेमके काय म्हणाले CM Devendra Fadnavis?
3

“… संस्था सुरु करण्यास परवानगी दिली जाणार नाही”; नेमके काय म्हणाले CM Devendra Fadnavis?

CSMIA चा जागतिक स्तरावर डंका! कचरा व्यवस्थापनात मानाचे ‘प्लॅटिनम रेटिंग’ मिळवणारं ठरलं देशातील प्रमुख विमानतळ
4

CSMIA चा जागतिक स्तरावर डंका! कचरा व्यवस्थापनात मानाचे ‘प्लॅटिनम रेटिंग’ मिळवणारं ठरलं देशातील प्रमुख विमानतळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.