
प्रवाशांच्या सुरक्षेबाबत रेल्वे प्रशासन खरोखरच गंभीर आहे की नाही?, असा संतप्त सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे. रीतसर तिकीट काढून आणि जास्त पैसे मोजून आरक्षण केलेल्या मूळ प्रवाशांना संपूर्ण प्रवासादरम्यान मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्वतःचे वैध आरक्षण असूनही आपल्या जागेवर आधीच इतर प्रवासी ठाण मांडून बसलेले किंवा झोपलेले आढळल्याने, मूळ प्रवाशांना सामानासह तासन् तास उभे राहावे लागत आहे.
सोयी-सुविधांवर परिणाम
अनधिकृत प्रवाशांच्या या वाढत्या घुसखोरीमुळे आरक्षित प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न तर निर्माण झाला आहेच, शिवाय त्यांना मिळणाऱ्या मूलभूत सोयी-सुविधांवरही अत्यंत वाईट परिणाम होत आहे. विशेषतः जनरल कोचच्या बाजूला असणाऱ्या स्लीपर डब्यांना या प्रकाराचा सर्वाधिक फटका बसता असल्याचे दिसून येते. जनरल डब्यात जागा ना मिळालेले असंख्य प्रवासी जवळच असलेल्या स्लीपर कोचमध्ये जबरदस्तीने घुसतात, ज्यामुळे अधिकृत प्रवाशांना नाहक मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. या सर्व गंभी परिस्थितीची कोकण रेल्वे प्रशासनाने तातडीने दखल घेऊन सर्व आरक्षित डब्यांमध्ये कडक तपासणी मोहीम राबवावी आणि दंडात्मक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
नियम मोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई
या संदर्भात कोकण रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रदान केला असता त्यांनी या विषयाची नोंद घेतली सांगितले, प्रशासनाकडून लवकरच विशेष अनधिकृतपणे प्रयास करणान्यांवर आणि नियम मोडणाऱ्यांवर कडक कायदेशीर आश्वासने न देता प्रत्यक्ष कारवाई करून प्रवासांच्या सुरक्षेचा आणि सोयी-अशी सर्वसामान्य आणि निर्वासित प्रवास करणान्या नारिकांची रास्त अपेक्षा आहे.