Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मध्यपूर्वेतील युद्धाचा मत्स्य व्यवसायावर परिणाम? कोकणातील कोळी बांधव चिंतेत

अरबी समुद्रात निर्यातक्षम माशांचे प्रमाण घटल्याने मच्छिमार आधीच अडचणीत आहेत. त्यातच मध्यपूर्वेतील तणावामुळे समुद्री व्यापारावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून कोळी बांधवांमध्ये आर्थिक संकटाची चिंता वाढली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 08, 2026 | 12:04 PM
मध्यपूर्वेतील युद्धाचा मत्स्य व्यवसायावर परिणाम? कोकणातील कोळी बांधव चिंतेत

मध्यपूर्वेतील युद्धाचा मत्स्य व्यवसायावर परिणाम? कोकणातील कोळी बांधव चिंतेत

Follow Us
Close
Follow Us:
  • अरबी समुद्रात माशांचे प्रमाण घटल्याने कोकणातील मच्छिमारांना कमी उत्पन्न मिळत आहे.
  • पर्ससीन बोटी आणि एलईडी दिव्यांमुळे पारंपरिक कोळी बांधवांच्या जाळ्यात मासे कमी येत असल्याची तक्रार आहे.
  • मध्यपूर्वेतील तणावामुळे समुद्री वाहतूक आणि मत्स्य निर्यातीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कोकण किनारपट्टीवरील मत्स्य व्यवसाय सध्या अनिश्चिततेच्या सावटाखाली आला आहे. अरबी समुद्रात निर्यातक्षम कोळंबी आणि इत्तर महत्वाचे मासे मोठ्या प्रमाणात सापडत नसल्यामुळे आधीच मत्स्य व्यवसाय अडचणीत आहे. त्यातच मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इराण इस्रायल संघर्षांच्या परिणामामुळे समुद्रमार्गे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यापारावरही परिणाम होत असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या दोन्ही परिस्थितीमुळे भविष्यात कोकणातील कोळी बांधवांसमोर मोठे आर्थिक आव्हान उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मच्छिमारांच्या मते, समुद्रात सध्या निर्यातक्षम कोळंबी, सुरमई, बांगडा यांसारख्या मार्शाचे प्रमाण घटले आहे. यामागे समुद्रातील पर्यावरणीय बदल, अति मासेमारी आणि विशेषतः पर्ससीन बोटी आणि एलईडी दिव्यांच्या अतिवापरामुळे होणारी मासेमारी हे महत्वाचे कारण मानले जात आहे. मोठ्या बोटींकडून एलईडी दिव्यांच्या सहाय्याने रात्री मोठ्या प्रमाणावर मासेमारी केली जात असल्याने पारंपरिक कोळी बांधवांच्च्या जाळ्यात मासे कमी प्रमाणात येत असल्याची तक्रार अनेकदा पुढे आली आहे.

मत्स्यदुष्काळ आणि जागतिक घडामोडींचा परिणाम

सध्या समुद्रात माशांचे प्रमाण कमी असल्यामुळे कोकणातील मच्छिमारांना युद्धाचा थेट फटका बसलेला नाही. मात्र भविष्यात जर समुद्रातील मत्स्यसंपदा पुन्हा वाढली. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय संघर्ष दीर्घकाळ सुरू राहिला, तर मासेमारी करून मिळणाऱ्या उत्पादनांच्या निर्यातीवर मोठा परिणाम होऊ शकतो. विशेषतः निर्यातक्षम कोळंबी व इतर उच्च मूल्यांच्या माशांच्या विक्रीत अडथळे निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर काही कोळी बांधवांनी आतापासूनच पर्यायी मार्गाचा विचार सुरू केला आहे. स्थानिक बाजारपेठांवर भर देणे, प्रक्रिया उद्योगाकडे वळणे, मत्स्य व्यवसायाबरोबर पूरक व्यवसाय उभारण्याच्या व्यवसायाला अत्यंत महत्वाचे स्थान आहे. मत्स्यदुष्काळ आणि जागतिक घडामोडींचा दुहेरी फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

समुद्री वाहतुकीवर परिणाम, निर्यातदारांत चिंता

परिणामी अरबी समुद्रातील मत्स्यसपदा कमी होत असल्याची मीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय पातळीवरील तणावामुळे समुद्री वाहतुकीवरही परिणाम होत आहे. भारतातून निर्यात होणारी साखर, केळी, द्राक्षे, मिरच्या, कांदे आणि इतर कृषी उत्पादने सध्या मोठ्या प्रमाणावर कंटेनरमध्ये भरून जेएनपीटी बंदरात पडून असल्याची माहिती व्यापार क्षेत्रातून मिळत आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर काही समुद्री मार्गावरील हालचालीवर निर्बंध येत असल्याने निर्यात प्रक्रियेत विलंब होत आहे. याचा थेट परिणाम कृषी उत्पादनाव्या व्यापारावर होत असून निर्यातदारांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Konkan fishermen in crisis fish production decline middle east war impact fish export

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 12:02 PM

Topics:  

  • Fishermen community
  • Marathi News
  • Ratnagiri

संबंधित बातम्या

Thane News: वाहनचालकांनो लक्ष द्या! कल्याण-शिळ रोडवर वाहतुकीचे निर्बंध, मेट्रो-१२ कामामुळे ‘या’ वेळेत रस्ता बंद
1

Thane News: वाहनचालकांनो लक्ष द्या! कल्याण-शिळ रोडवर वाहतुकीचे निर्बंध, मेट्रो-१२ कामामुळे ‘या’ वेळेत रस्ता बंद

अमृता खानविलकरचा नवा प्रवास; महिला दिनानिमित्त ‘अमूल्य’ साडी ब्रँडची सुरुवात, चाहत्यांना दिले सरप्राईज
2

अमृता खानविलकरचा नवा प्रवास; महिला दिनानिमित्त ‘अमूल्य’ साडी ब्रँडची सुरुवात, चाहत्यांना दिले सरप्राईज

अखेर अपूर्वा आणि अंशुमनची बांधली रेशीमगाठ! वधू- वराचे लग्नाचे फोटो पाहून चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव
3

अखेर अपूर्वा आणि अंशुमनची बांधली रेशीमगाठ! वधू- वराचे लग्नाचे फोटो पाहून चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव

Ahilyanagar News: सेतुचालकांवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका! फसवणूक करून हडपली चक्क 21 एकर जमीन; नेवाशात गुन्हा दाखल
4

Ahilyanagar News: सेतुचालकांवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका! फसवणूक करून हडपली चक्क 21 एकर जमीन; नेवाशात गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.