
रत्नागिरी अध्यक्ष, सभापती सव्वा वर्षाचा
शिवसेनेत विकेंद्रीकरणाचे नवीन समीकरण
बंडखोरी करणाऱ्यांना पालकमंत्र्यांचा कडक इशारा
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही जोरदार यश मिळवल्यानंतर आता जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समितीचे सभापती कोण होणार याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. याबाबत उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी येथील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात आणि त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना, एक महत्वपूर्ण घोषणा केली. नवनियुक्त गटनेते, प्रतोद, जिल्हा परिषद अध्यक्ष पंचायत समिती सभापती आणि उपसभापती या सर्वांचा कार्यकाळ हा सव्वा वर्षांचा राहणार आहे.
सव्वा वर्षांचा कालावधी संपताच संबंधित पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे द्यावयाचे आहेत. त्यामुळे इतर पदाधिकाऱ्यांनाही संधी मिळू शकेल आणि हा निर्णय पक्ष स्तरावर घेण्यात आला असून ती अंतिम आहे, अशी घोषणा पालकमंत्री सामंत यांनी केली आहे. जिल्हा परिषदेच्या गटनेतेपदी विलास चाळके तर मुख्य प्रतीद माणून बाबू माप यांची निवड इशलपे आहे. त्यामुळे सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याची उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिदि यांच्या धोरणाची ही अंमलबजावणी असून पालकमंत्र्यांकडून जाहीर करण्यात आलेला हा सव्वा वर्षाचा फार्मूला आता राजकीय वर्तुळात बचत आला आहे. पालकमंत्री सामंत यांनी सांगितली की, रत्नागिरी जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच जिल्ह्यातील सर्व नऊच्या नऊ पंचायत समितीचे सभापती यावेळी शिवसेनेचे असतील.
बंडखोरी करणाऱ्यांना पालकमंत्र्यांचा कडक इशारा
जिल्ह्यात शिवसेनेने भाजपाच्या बरोबरीने जे जोरकस काम निवडणुकांमध्ये केले आहे. त्यामुळेच रत्नागिरी जिल्हा हा राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये निवडणुकीच्या यशात ९४ टक्के यश मिळवून सर्वप्रथम आहे, हे भूषणावह आहे. राजापूर, लांजा रत्नागिरी, संगमेश्वर, गुहागर, चिपळूण खेड मंडणगड आणि दापोली या सर्व ठिकाणी पंचायत समिती सभापती म्हणून शिवसेनेचे सदस्य विराजमान होणार आहे.
ZP Election 2026: अटीतटीच्या आखाड्यात विक्रम खुटवड ठरले सिंघम; दुरंगी ऐवजी पंचरंगी…
संगमेश्वरमध्ये पंचायत समिती सभापती पद हे अडीच वर्षांसाठी शिवसेनेकडे अस्सेर गुहागरमधील पंचायत समिती सभापतीपद पाच वर्षांसाठी शिवसेनेक असेल, देवरुख आणि चिपळूण य अडीच वर्षाचा कालावधीचे सभापतीप असेल. जिल्हा परिषद आणि पंचाय समितीच्या निवडणुकीत ज्यांनी पक्षा असूनही पक्षाशी बंडखोरी करणान्यांन मदत केली किंवा बंडखोरांशी मैत्री ठेवल त्या सर्वांना पालकमंत्री सामंत यांनी कडम इशारा दिला आहे. पक्षाचे नेते एकनाथ शि यांची ही फसवणूक असून अशा लोकां पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला जाईल असा इशारा मंत्री सामंत यांनी यावेळ बोलताना दिला.