Sahitya Akademi Awards 2025: साहित्य अकादमीने आज संस्थेच्या मान्यताप्राप्त 24 भारतीय भाषांमधील वार्षिक साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा केली. 2025 या वर्षासाठीच्या साहित्य अकादमी पुरस्कारांमध्ये 8 काव्यसंग्रह, 4 कादंबऱ्या, 6 लघु कथासंग्रह, 2 ललित लेख, 1 साहित्यिक समीक्षा, 1 आत्मचरित्र आणि 2 स्मरणस्वरुप साहित्यकृतीना पुरस्कार जाहीर झाले.
2025 या वर्षासाठीच्या साहित्य अकादमी पुरस्कारांमध्ये राजू बाविस्कर यांच्या काळ्यानिळ्या रेषा या मराठी भाषेतील आत्मचरित्राला पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच हेन्री मेंडोन्सा (H.M. Pernal) यांच्या कोकणी काव्येम : रूपांनी आनी रूपकम (Konkani Kavyem: Rupani Ani Rupakam) या कोकणी भाषेतील ललित लेख संग्रहाला पुरस्कार जाहीर झाला आहे.
Crime News: नर्सची गळफास घेऊन आत्महत्या, जातीवाचक शिवीगाळ अन्….; सिडको ठाण्यात गुन्हा नोंद
डिसेंबर २०२५ मध्ये नियोजित असलेली पत्रकार परिषद लांबणीवर पडल्यामुळे निर्माण झालेली साहित्यप्रेमींची प्रतीक्षा अखेर संपली आहे. भारतीय साहित्यातील अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘साहित्य अकादमी’ पुरस्कारांची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, यामध्ये २४ वेगवेगळ्या प्रादेशिक भाषांमधील उत्कृष्ट साहित्यकृतींची निवड करण्यात आली आहे. भारताची भाषिक विविधता आणि वैचारिक एकता या पुरस्कारांच्या माध्यमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
साहित्य अकादमीच्या वतीने दरवर्षी संस्थेद्वारा मान्यताप्राप्त 24 भाषांसाठी आपल्या प्रचलित प्रक्रियेद्वारे पुरस्कार दिले जातात. 2025 या वर्षासाठीच्या साहित्य अकादमी पुरस्कारांसाठीची प्रक्रिया जानेवारी 2025 मध्ये सुरू झाली होती. या संदर्भात 30 जानेवारी 2025 रोजी सार्वजनिक जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली होती. 24 भारतीय भाषांसाठीच्या नामवंत परिक्षक सदस्यांनी शिफारस केलेल्या पुरस्कारांना, साहित्य अकादमीच्या सक्षम प्राधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे.
कोरीवकाम केलेले ताम्र स्मृतिचिन्ह , शाल आणि प्रत्येकी 1,00,000/- रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्कार विजेत्यांना येत्या 31 मार्च 2026 रोजी नवी दिल्ली इथे, समारंभपूर्वक हे पुरस्कार प्रदान केले जातील.
Middle East War : 70000 कोटींचे IPO अडकले? Jio पासून Flipkart पर्यंत कोणाकोणाचा समावेश?
या वर्षाच्या पुरस्कारांमध्ये बंगाली कवी प्रसून बंदोपाध्याय यांच्या सर्वोत्कृष्ट कवितासंग्रहाचा सन्मान करण्यात आला आहे. गुजराती साहित्यातून योगेश वैद्य यांच्या ‘भट्टखडकी’ आणि कन्नडमधून अमरेश नुग्दोनी यांच्या ‘दादा सिरिसु तांडे’ या कलाकृतींची निवड करण्यात आली आहे. राजस्थानी साहित्यासाठी जितेंद्र कुमार सोनी यांच्या ‘भरखमा’ आणि पंजाबी साहित्यासाठी जिंदार यांच्या ‘सेफ्टी किट’ या विशेष रचनेला गौरवण्यात आले आहे.
संस्कृत भाषेसाठी महामहोपाध्याय साधू भद्रेशदास यांच्या ‘प्रस्थानचतुस्तये ब्रह्मघोष’ या ग्रंथाची निवड करून सांस्कृतिक एकात्मतेचा धागा गुंफला गेला आहे. तर उर्दू साहित्यातून प्रीतपाल सिंग बेताब यांच्या ‘सफर जारी है’ या काव्यसंग्रहाचा गौरव झाला आहे. याशिवाय संथाली भाषेतील सुमित्रा सोरेन (मिड बिरना चेन्ने साओन इनाग सगाई) आणि मल्याळममधील एन. प्रभाकरन (मायमानुष्यार) यांच्या साहित्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
हे २४ पुरस्कार विजेते केवळ लेखक नसून ते आपल्या चैतन्यमय संस्कृतीचे प्रतिनिधी आहेत. भारतीय साहित्य हे आपल्या मुळांशी किती घट्ट रुजलेले आहे आणि जागतिक दृष्टीने किती समृद्ध आहे, हेच या पुरस्कारांच्या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. लवकरच एका विशेष सोहळ्यात या साहित्यिकांचा सन्मान केला जाणार आहे.






