Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : आणीबाणीत ज्यांनी वर्तमानपत्र बंद पाडलं त्यांचा मुलगा आज भाजपात; शंकररावांवरून संजय राऊतांचा पलटवार

भाजपने 25 जून हा दिवस "संविधान हत्या दिवस" म्हणून साजरा करत काँग्रेसवर टीका केली. मात्र, सध्या देशात अघोषित आणीबाणी सुरू असल्याचा आरोप करत खासदार संजय राऊत यांनी भाजपवर पलटवार केला आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jun 26, 2025 | 08:35 PM
आणीबाणीत ज्यांनी वर्तमानपत्र बंद पाडलं त्यांचा मुलगा आज भाजपात; शंकररावांवरून संजय राऊतांचा पलटवार

आणीबाणीत ज्यांनी वर्तमानपत्र बंद पाडलं त्यांचा मुलगा आज भाजपात; शंकररावांवरून संजय राऊतांचा पलटवार

Follow Us
Follow Us:

25 जून 1975 भारताच्या राजकीय इतिहासातील एक वादग्रस्त दिवस. याच दिवशी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती. भाजपने याच पार्श्वभूमीवर 25 जून हा दिवस “संविधान हत्या दिवस” म्हणून साजरा करत काँग्रेसवर टीका केली. मात्र, विरोधकांच्या मते सध्या देशात अघोषित आणीबाणी सुरू असल्याचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना राऊत म्हणाले, “हुकूमशाहीचं मोठं उदाहरण म्हणजे श्वेता संजीव भट. त्या गेल्या सात वर्षांपासून आपल्या पतीसाठी संघर्ष करत आहेत. हीच खरी आणीबाणी आहे. आणीबाणीविषयी बोलणाऱ्यांनी आताची परिस्थिती पाहावी.”

आणीबाणीच्या काळात पत्रकारांचे आवाज दाबण्यात आले, वृत्तपत्रे बंद पाडण्यात आली. त्यावेळी ‘मार्मिक’सारखं व्यंगचित्र साप्ताहिकही बंद करण्यात आलं. त्यावेळी ज्यांनी वर्तमानपत्रांवर बंदी घातली, त्या शंकरराव चव्हाण यांचा मुलगा आज भाजपमध्ये आहे. अशोक चव्हाण आता मोदींचे लाडके झाले आहेत, असा मिश्किल टोला त्यांनी लगावला.

मोदींवर सरेंडरचा आरोप

पहल्गाम हल्ला आणि पाकिस्तानविरोधी कारवाया याबाबत विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी होत असताना केंद्र सरकार दुर्लक्ष करत असल्याचाही आरोप राऊत यांनी केला. “आम्हाला विचारायचं आहे की मोदीजी, आपण सरेंडर का केलं?” असा थेट सवालही त्यांनी केला.

“लोकशाहीचा रोज खून”

देशात गेल्या 11 वर्षांपासून अघोषित आणीबाणी सुरू असल्याचं मत व्यक्त करत राऊत म्हणाले, “इंदिरा गांधींनी आणीबाणी घोषित केली ती परिस्थितीच्या अनुषंगाने होती. ती त्यांची घटनात्मक बाजू होती. मात्र आज कोणतीही घोषणा न करता लोकशाही गुदमरवली जात आहे.”

मोदी आणि अमित शहा हे दररोज लोकशाहीचा खून करत असल्याचा घणाघात करत राऊत म्हणाले, “आम्ही आणि अनिल देशमुख तुरुंगात गेलो, ते देशासाठी होतं. आता आमच्यासाठी पेन्शन जाहीर करा,” असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.

Web Title: Sanjay raut counter attack on bjp shankarraoson ashok chavan joins bjp who closed down newspapers during emergency

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2025 | 08:35 PM

Topics:  

  • 50 years of Emergency
  • BJP
  • sanjay raut

संबंधित बातम्या

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’
1

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’

‘उमेदवारी अर्ज रद्द करणे म्हणजे लोकशाहीवर अन्याय’; ‘स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईची गरज’, हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर हल्लाबोल
2

‘उमेदवारी अर्ज रद्द करणे म्हणजे लोकशाहीवर अन्याय’; ‘स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईची गरज’, हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर हल्लाबोल

भोर नगरपरिषदेची सभा वादळी, नगरसेविकांच्या आरोपानंतर नगराध्यक्षांचा लेखी माफीनामा; नेमकं काय घडलं?
3

भोर नगरपरिषदेची सभा वादळी, नगरसेविकांच्या आरोपानंतर नगराध्यक्षांचा लेखी माफीनामा; नेमकं काय घडलं?

‘राऊतांना उद्धव ठाकरेंनी इतकं झापलं की, फक्त मारायचं बाकी होतं’; बच्चू कडू यांचा खळबळजनक दावा
4

‘राऊतांना उद्धव ठाकरेंनी इतकं झापलं की, फक्त मारायचं बाकी होतं’; बच्चू कडू यांचा खळबळजनक दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.