
Sanjay Raut, Marathi Language, Maharashtra Politics,
रिक्षाचालकांना मराठी येणे आवश्यक असल्याच्या मुद्द्यावर बोलताना राऊत म्हणाले की, शहरात रोजीरोटी मिळवण्यासाठी येणाऱ्या लोकांनी स्थानिक भाषेचा आदर केला पाहिजे. प्रवासी बहुसंख्य मराठी भाषिक असल्याने भाषेअभावी गैरसमज, वाद आणि मारामाऱ्या होतात. त्यामुळे स्वतःच्या सोयीसाठी मराठी शिकणे गरजेचे आहे. मात्र, या मुद्द्यावर सरकारलाच आव्हान देण्याची भाषा केली जात असल्याचे त्यांनी नमूद केले. “मराठीच्या मुद्द्यावर सरकारला आव्हान म्हणजे महाराष्ट्रालाच आव्हान,” असे ते म्हणाले.
Amit Thackeray : …तर रस्त्यावर उतरून मारू; अमित ठाकरेंचा परप्रांतीय रिक्षाचालकांना इशारा
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पूर्वीच्या “महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीची” या घोषणेची आठवण करून दिली. “त्या गर्जनेचे आता काय झाले? सरकारने स्पष्ट कायदे व नियम करावेत आणि मराठी न येणाऱ्यांना सहा महिन्यांची मुदत देऊन भाषा शिकण्याची संधी द्यावी,” सरकार मराठीच्या मुद्द्यावर मागे हटत असेल, तर संबंधित मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
केईएम रुग्णालयाच्या नामांतराच्या वादावर बोलताना राऊत यांनी उद्योगपती लोढा यांच्यावर निशाणा साधला. “केईएम रुग्णालय हे कोणत्याही खासगी व्यक्तीने बांधलेले नाही. अनेक वर्षांपासून ते जनतेची सेवा करत आहे आणि त्या नावाला ऐतिहासिक ओळख आहे,” असे ते म्हणाले.
लोढा यांच्यावर आरएसएसचा अजेंडा पुढे नेण्याचा आरोप करत, संजय राऊतांनी लोढा यांच्या बांधकाम प्रकल्पांतील इंग्रजी नावांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “जर गुलामीची प्रतीके हटवायची असतील, तर सर्वप्रथम स्वतःच्या प्रकल्पांतील ‘ट्रम्प’सारखी नावे बदलून छत्रपती शिवाजी महाराज किंवा भारतीय संस्कृतीशी निगडित नावे द्यावीत,” असा टोला त्यांनी लगावला.
या मुद्द्यावर शिवसेनेने आंदोलन केल्याचे सांगत, स्थानिक आमदार अजय चौधरी आणि इतर पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतल्याची माहिती त्यांनी दिली. “प्रथम स्वतःपासून सुरुवात करा, त्यानंतरच आम्ही तुमच्या प्रस्तावाचा विचार करू,” असे राऊत म्हणाले.
मोठी बातमी! ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी केले स्थानबद्ध
विधान परिषद निवडणुकीबाबत बोलताना राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना निवडणूक लढवण्याची विनंती काही नेत्यांनी केली आहे. महाविकास आघाडीला विधिमंडळात सक्षम नेतृत्व मिळावे, या उद्देशाने ही मागणी करण्यात आली आहे. “अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेतील. ते पक्षप्रमुख असून परिस्थिती लक्षात घेऊनच निर्णय करतील. आमची इच्छा असली तरी त्यांचा निर्णय महत्त्वाचा असेल,” असे राऊत यांनी स्पष्ट केले.