फोटो सौजन्य सोशल मीडिया
दिव्यांग व्यक्तींना रस्त्यावरून प्रवास करताना खड्डे, असमतोल रस्ते आणि विविध अडथळ्यांचा मोठा त्रास सहन करावा लागतो. मात्र, या समस्येविरोधात केवळ तक्रार न करता त्यांनी स्वतःच रस्त्यावर उतरून खड्डे बुजविले. त्यामुळे आंदोलनाला सामाजिक बांधिलकीची वेगळी किनार मिळाली.
संस्थेचे अध्यक्ष अजय पवार यांच्यासह अमोल प्रकाश निकम, अमोल भातुसे, ताज भाई मुलानी, शैलेंद्र बोर्डे, शांताराम देवरे, पांडुरंग शेलार, बाळासाहेब रेवले, संतोष भोसले, देवरे दादा आणि अन्य दिव्यांग बांधवांनी आंदोलनात सहभाग घेतला.
“आम्हाला सहानुभूती नको; सुरक्षित आणि सन्मानाने चालता येईल असे रस्ते हवेत,” असा स्पष्ट संदेश यावेळी देण्यात आला. दिव्यांग बांधवांनी खड्डे भरताना नागरिकांचेही लक्ष वेधून घेतले.
म्हसवड येथे संत नामदेव महाराजांचा ६७६ वा संजीवन समाधी सोहळा उत्साहात संपन्न
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने झालेल्या या आंदोलनातून शहरातील रस्त्यांची अवस्था आणि दिव्यांगांच्या दैनंदिन अडचणी अधोरेखित झाल्या. स्वतः अडचणींना सामोरे जात असतानाही शहरासाठी पुढाकार घेणाऱ्या या बांधवांचे नागरिकांनी कौतुक केले. ‘ज्यांना आधाराची गरज आहे, त्यांनीच आज शहराला आधार दिला,’ अशी भावना यावेळी व्यक्त झाली.

