
Satara News, Koregaon Ghevda, Crop Insurance Scheme
सातारा जिल्ह्या्त रब्बी हंगामात सर्वाधिक शेतकरी घेवडा पीक घेतात विशेष करून जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात सर्वाधिक घेवडा उत्पादन घेतले जाते अस असतानाही घेवडा पीक विम्या बाबत असलेल्या चुकीच्या निकषामुळे वंचित आहे याचा सर्वाधिक मोठा फटका या शेतकऱ्यांना सहन करावा लागतं आहे.
Wardha News : एसएनसीयूमध्ये एकच व्हेंटिलेटर, जिल्हा रुग्णालयातील प्रकार; रेफर आऊटवर दिला जातोय भर
सध्या पावसाभावी घेवडा पीक अडचणीत सापडलं आहे एकरी 20तें 25हजार खर्च करून जोपसलेले हे पीक आता वाळू लागलं आहे. शासनाने या पिकाची पहाणी करून या पिकासाठी मदत करावी, अशी मागणी हे शेतकरी करू लागले आहेत. असं असलं तरी हे पीक पीकविम्यात नसल्याने याला नुकसान भरपाई कशी मिळणार हा प्रश्न आहे.
मुळात अलीकडच्या काही वर्षा पासून पावसाचा लहरी पणा या पिकासाठी त्रास दायक ठरत आहे. मध्यम पाऊस ढगाळ वाटावारणात येणार हे पीक आता कडक उन्हामुळे वाया जाऊ लागलं आहे. अजून काही रिवसात पाऊसाने उघडीप दिली तर हे पीक हातातून जाईल अशी परस्थिती आहे.
2020पासून राज्य शासनाचा कृषी विभाग अपयशी
राज्य शासनाने घेवडा पीकविम्यात घ्यावा यासाठी राज्य शासन केंद्राकडे गेली सात वर्षा पासून पाठपुरावा करत आहे. मात्र केंद्रातून अद्याप हे पीक पीक विम्यात घेतलं नाही. आम्ही हळद, आलं, आणि घेवडा ही तिन्ही पीक पीक विम्यात घ्यावी, असा प्रस्ताव आम्ही दिला होता. यातील हळद पीक आता पीक विम्यात समाविष्ठ झाले आहे. लवकरच घेवडा आणि आलं ही पीकेदेखील पीकविम्यात सामील केली जातील. असं सातारा जिल्हा कृषी अधीक्षत भाग्यश्री फरांदे यांनी म्हटलं आहे.
मुळात केंद्राकडे घेवडा हे पीक भाजीपाला प्रकारात नोंद आहे ते बदलून कडधान्य प्रकारात ते घ्यावे लागेल. तरच ते पीक विम्यासाठी पात्र होईल.
कोरेगाव उत्तर भाग हा दुष्काळी भाग म्हणून परिचित आहे. या भागात सर्वात जास्त घेवडा पीक घेतलं जात. चालू वर्षी घेवडा पेरणी पासून या पिकला हवा तसा पाऊस पडला, मात्र सध्या उन्हाची तीव्रता वाढू लागली असून घेवडा पीक शेंगा भरणी काळ सुरु आहे. मात्र ऊन आणि पाणी नसल्याने आता हे पीक हातातून जाईल अशी भीती आहे. शासनाने खास बाब म्हणून या पिकासाठी मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी विकास मतकर यांनी केली आहे.