भाजप प्रवेशासाठी निघालेल्या ठाकरेंच्या नगरसेवकांचा ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
मिळालेल्या माहितीनुसार हे नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. पण भाजत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांच्या नेतृत्वात नगरसेवकांचा हा गट मुंबईच्या दिशेने रवानाही झाला. पण पुण्यात पोहोचल्यानंतर मात्र या नगरसेवकांनी अचानक यू-टर्न घेतला. हे सर्व नगरसेवक पुन्हा धाराशिवला पोहोचले आणि ओमराजे निंबाळकर यांच्या मार्फत त्यांना थेट ठाण्यात नेण्यात आले. बुधवारी रात्री उशिरा या नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या शिंदे गटात प्रवेश केला. या नगरसेवकांच्या पळवापळवीमुळे धाराशिवच्या राजकारणात या घडामोडीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
Pune BJP-NCP Clash: पुणे महापालिकेत भाजप-राष्ट्रवादीत ‘लेटर वॉर’चा भडका; सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना
धाराशिवच्या कळंब नगर परिषदेतील ठाकरे गटाचे १० नगसेवकांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर धाराशिव शहरातील नगरसेवकांनाही भाजपमध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सुरू होती. नगरसेवकांच्या या पळवापळवीला ऑपरेशन लोटस बोलल जात होतं. पण धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भाजपचे हे प्रयत्न उद्ध्वस्त करत ऑपरेशन टायगरच्या राबवल्याची चर्चा धाराशिवच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असलेल्या नगरसेवकांनी थेट शिंदेंच्या शिवसेनेत शिंदे गटानेच भाजपचा प्लॅनिंगला सुरूंग लावल्याचे बोलले जात आहे.
धाराशिवच्या स्थानिक राजकारणात उद्धव ठाकरे यांच्या गटाकडे आणखी दोन नगरसेवक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्याचबरोबर भाजपच्या गोटात गेलेल्या एका नगरसेवकाच्या प्रवेशाबाबतही चर्चा सुरू आहे. त्यामुळे आगामी काळात आणखी कोणते नगरसेवक कोणत्या पक्षाची वाट धरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नगरसेवकांच्या या पक्षांतरामुळे धाराशिवचे राजकारण चांगलेच तापले आहे. आगामी स्थानिक राजकीय समीकरणांवर या पक्षांतरांचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
FMGE Exam: मेडिकलच्या विद्यार्थ्यांचे जंतर मंतरवर आंदोलन; जाणून घ्या नेमक्या काय आहेत उमेदवारांच्या
नगरसेवकांच्या पक्षांतरामागे आर्थिक व्यवहाराची चर्चा
दरम्यान, नगरसेवकांच्या पक्षांतरामागे मोठ्या आर्थिक व्यवहारांची चर्चाही सुरू झाली आहे. नगरसेवकांची फोडाफोड करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची बोली लावली जात असल्याची कुजबुज नागरिकांमध्ये असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या कथित आर्थिक व्यवहारांबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे या चर्चांमध्ये कितपत तथ्य आहे, हे स्पष्ट होणे बाकी आहे. आता आणखी नगरसेवक पक्षांतर करतात का, कोणत्या गटाला त्याचा फायदा होतो आणि धाराशिवच्या स्थानिक राजकारणातील सत्तासमीकरण कसे बदलते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.






