
स्मार्ट मीटर बसवणे हे सर्वसामान्य ग्राहकांवर बंधनकारक नसल्याचा दावा करत सावंत यांनी शासनाच्या अधिसूचना आणि तांत्रिक अटींचा दाखला दिला. ज्या भागात संचार नेटवर्क उपलब्ध नाही, त्या ठिकाणी पूर्वभुगतान मीटर वापरण्याची तरतूद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच साडेसहाशे वोल्टपेक्षा अधिक क्षमतेच्या वीजजोडण्यांसाठी स्वतंत्र तांत्रिक नियम लागू करण्यात आले असून, हे नियम केवळ वीज वितरण व्यवस्थेच्या आधुनिकीकरणासाठी मार्गदर्शक स्वरूपाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
Maharashtra Politics: सत्ताधारीच भांडले! सातारा भाजपमध्ये मतभेद; उदयनराजे भोसले यांनी थेट…
“स्मार्ट मीटरच्या नावाखाली नागरिकांवर सक्ती केली जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. महावितरणने याबाबत स्पष्ट भूमिका मांडून जनतेचा संभ्रम दूर करावा. कोणत्याही प्रकारे जबरदस्ती सहन केली जाणार नाही,” असा इशारा प्रणव सावंत यांनी दिला.
यावेळी जिल्हा संघटक रविराज पांडुरंग बडदरे, प्रदिजा पवार, अॅड. दीपक साळुंखे, अभिराज देशमुख, विकास हादवे, केतन पाटील, शैलेश बोडके आदी उपस्थित होते. दरम्यान, महावितरण प्रशासनाने तातडीने कार्यशाळा आणि जनजागृती कार्यक्रम आयोजित करून नागरिकांना वस्तुस्थिती समजावून सांगावी, अन्यथा “शिवसेना स्टाईल” आंदोलन छेडून संपूर्ण सातारा जिल्ह्यात तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा थेट इशारा ग्राहक संरक्षण कक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.
Satara: गॅससाठी महिलांची रिकाम्या सिलेंडरसह जिल्हा पुरवठा कार्यालयावर धडक; वितरण व्यवस्थेचा बोजवारा!