Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नोकरीसाठी देशात कुठेही जायची तयारी ठेवा; शरद पवार यांचा अनमोल सल्ला

अनेक जण आमच्याकडे नोकऱ्या मागायला येतात पण नोकरी मिळाली तर देशात कुठेही जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 22, 2024 | 02:29 PM
नोकरीसाठी देशात कुठेही जायची तयारी ठेवा; शरद पवार यांचा अनमोल सल्ला
Follow Us
Close
Follow Us:

पाटस : राज्यात ठीकठिकाणी मोठ्या नामांकित कंपन्यांच्या औद्योगिक वसाहती आहेत. मात्र तरीही दिवसेंदिवस बेरोजगारांची संख्या वाढत आहे. अनेक जण आमच्याकडे नोकऱ्या मागायला येतात पण नोकरी मिळाली तर देशात कुठेही जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

दौंड तालुक्यातील वरवंड येथे सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींसाठी दौंड नोकरी महोत्सव कार्यक्रम रविवारी (दि २१) पार पडला. या नोकरी महोत्सवांमध्ये जवळपास 41 नामांकित कंपन्या सहभागी झाल्या होत्या. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार म्हणाले , राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी परराज्यात जाणाऱ्या कंपन्या आणि उद्योग व्यवसाय या महाराष्ट्रात राहिल्या पाहिजेत आणि येथील स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे या उद्देशाने जागा उपलब्ध करून दिली. मी हि मुख्यमंत्री असताना पिंपरी चिंचवड सारख्या भागात बजाज या एकाच कंपनीला जागा उपलब्ध करुन दिली तर आज त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपन्या आल्या असून लाखो बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी मिळाली.

पुणे, बारामती, दौंड यासह कोल्हापूर, सोलापूर ,सांगली, सातारा औरंगाबाद या ठिकाणीही मोठ्या औद्योगिक वसाहती निर्माण झाल्या आहेत. मात्र सध्या तरीही बेरोजगारची संख्या वाढत आहे. शेती बरोबर स्वतःचा उद्योग व्यवसाय उभा करून दुसऱ्याकडून नोकरी मागण्यापेक्षा आपण ही दुसऱ्याला कशी नोकरी देता येईल हेही पहावे. कष्ट आणि मेहनत करण्याची तयारी ठेवली पाहिजे, पण सध्या तरुण आणि तरुणी आपल्या गावाजवळ सोयीनुसार नोकरी पाहिजे त्यासाठी धडपड करतात. पण नोकरी करायची असेल तर दुसऱ्या राज्यात जाण्याची तयारी पाहिजे तरच तुम्ही यशस्वी होताल असा सल्ला माजी कृषिमंत्री पवार यांनी यावेळी उपस्थित तरुण आणि तरुणींना दिला.

याप्रसंगी शिरूर हवेली चे आमदार अशोक पवार, राष्ट्रवादीचे नेते जगन्नाथ शेवाळे, युगेंद्र पवार तसेच विविध नामांकित कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Sharad pawars precious advice to the youth nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2024 | 02:29 PM

Topics:  

  • maharashtra
  • Nationalist Congress Party
  • Patas

संबंधित बातम्या

आरोग्य यंत्रणा कोलमडण्याची शक्यता! डॉक्टरांनी दिली संपाची हाक, काय आहे कारण?
1

आरोग्य यंत्रणा कोलमडण्याची शक्यता! डॉक्टरांनी दिली संपाची हाक, काय आहे कारण?

Fire News : आंबिवली गावामधील घराला भीषण आग, घरातील सर्व साहित्य जळून खाक
2

Fire News : आंबिवली गावामधील घराला भीषण आग, घरातील सर्व साहित्य जळून खाक

Thane News : “घोडबंदर रोड सर्विस रोड विलीनीकरणाचे काम तत्काळ थांबवा,नाहीतर…”, राजन विचारे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
3

Thane News : “घोडबंदर रोड सर्विस रोड विलीनीकरणाचे काम तत्काळ थांबवा,नाहीतर…”, राजन विचारे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

शेतकरी आणि विद्यार्थ्यांसाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय, वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या भत्त्यात वाढ, तर शेतकरी भवन योजनेलाही…
4

शेतकरी आणि विद्यार्थ्यांसाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय, वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या भत्त्यात वाढ, तर शेतकरी भवन योजनेलाही…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.