Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज ठाकरेंना शिंदे गटातील नेत्यांचे प्रत्युत्तर; म्हणाले, ‘त्यांच्या विचारांवर महाराष्ट्र चालेल का?’

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी कर्जत येथे पार पडलेल्या सहकार मेळाव्यामध्ये सत्ताधारी पक्ष आणि पक्ष बदलून सत्तेमध्ये सामील झालेल्या नेत्यांचा खरपूस समाचार घेतला.यावर आता शिंदे गटातील नेत्यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 07, 2024 | 12:12 PM
राज ठाकरेंना शिंदे गटातील नेत्यांचे प्रत्युत्तर; म्हणाले, ‘त्यांच्या विचारांवर महाराष्ट्र चालेल का?’
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई :  मनसे (MNS) पक्षप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कर्जत येथे पार पडलेल्या सहकार मेळाव्यामध्ये जोरदार बॅटिंग करत राजकारण्यांवर (Political News) टीकेची झोड उठवली. यावेळी त्यांनी सत्ताधारी पक्ष आणि पक्ष बदलून सत्तेमध्ये सामील झालेल्या नेत्यांचा खरपूस समाचार घेतला. “महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून सहकार चळवळ उभी राहिली. मात्र आता असलेले सरकार म्हणजे सहकार चळवळ नाही. तर ‘सहारा’ चळवळ आहे. अडकलेल्यांना सहारा द्या. सगळ्यांनी मिळून सरकार चालवायचं म्हणजे सहकार चळवळ नाही” असा टोला राज ठाकरे यांनी लगावला होता. यावर आता शिंदे गटातील (Shinde Group) नेत्यांनी प्रतिक्रिया दिली असून चोख प्रत्युत्तर राज ठाकरे यांना दिले आहे.

सध्याच्या राजकारणावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, ‘आपल्याकडचे नेते लाचार, मिंधे झाले आहेत. पैशांसाठी वेडे झालेले आहेत. राजकारण्यांनी स्वाभिमान गहाण ठेवला आहे’  त्यावर प्रतिक्रिया देताना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील म्हणाले, “ज्यांनी आपल्या विचारांना तिलांजली देऊन स्वाभिमान गहाण ठेवला असेल, त्यांना हे लागू होईल. आम्ही पक्षांतर केले म्हणून ते आम्हाला बोलले, असे कुणाला वाटत असेल तर आम्हाला मात्र त्या गोष्टीचा पश्चाताप नाही. कारण आम्ही भगव्या झेंड्याच्या विचाराने 35 वर्ष पक्षाचे काम केले. ते विचार आम्ही सोडलेले नाहीत. ज्यांनी हे विचार सोडले त्यांना राज ठाकरे जे बोलले ते लागू होईल.” असे मत गुलाबराव पाटील यांनी मांडले.

तसेच ‘गुजरातचा महाराष्ट्रावर डोळा असून महाराष्ट्राचे तुकडे होतील’ अशी भीती राज ठाकरे यांनी व्यक्त केली होती. यावर प्रतिक्रिया देताना गुलाबराव पाटील म्हणाले, “ हे राज ठाकरेंचे विचार आहेत. पण यावर महाराष्ट्र चालेल की नाही?”  याची मला कल्पना नाही.

आमदार संजय शिरसाट यांची सकारात्मक प्रतिक्रिया

त्याचबरोबर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी देखील राज ठाकरेंच्या टीकेवर प्रतिक्रिया दिली मात्र आम्ही त्याची टीका सकारात्मक पद्धतीने घेऊ असे मत त्यांनी व्यक्त केले. शिरसाट म्हणाले, “ते एका पक्षाचे नेते आहेत, त्यांनी काय बोलावे हा त्यांचा विषय आहे. सरकार गतिमान पद्धतीने काम करत आहे. पण राज ठाकरे यांनी काही आरोप केले, तर निश्चितच त्याचा त्रास आम्हाला होतो. त्यांच्या बोलण्यात नेहमीच वेगळेपण असते. त्यांच्या टीकेला आम्ही गांभीर्याने घेत असून जर आमचे काही चुकत असेल तर ते निश्चितच दुरुस्त करू.”

Web Title: Shinde group leader gives replies to raj thackeray criticism nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2024 | 12:11 PM

Topics:  

  • Gulabrao Patil
  • Karjat
  • political news
  • raj thackeray
  • Sanjay Shirsat
  • Shinde group

संबंधित बातम्या

कोल्हापूरात राजकीय वातावरण रंगलं! कॉंग्रेसला झटका देत राहुल पाटलांचा महायुतीमध्ये प्रवेश निश्चित
1

कोल्हापूरात राजकीय वातावरण रंगलं! कॉंग्रेसला झटका देत राहुल पाटलांचा महायुतीमध्ये प्रवेश निश्चित

Voter List Fraud : महाराष्ट्राच्या मतदार याद्यांमध्ये भाजपकडून फेरफार, खुणा अन् बदल? जितेंद्र आव्हाड यांचे गंभीर आरोप
2

Voter List Fraud : महाराष्ट्राच्या मतदार याद्यांमध्ये भाजपकडून फेरफार, खुणा अन् बदल? जितेंद्र आव्हाड यांचे गंभीर आरोप

Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले….
3

Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले….

BEST Election Results: पहिल्याच परिक्षेत ठाकरे बंधु नापास, ‘बेस्ट टेस्ट’ मध्ये हरले उद्धव-राज, वाचा निकाल
4

BEST Election Results: पहिल्याच परिक्षेत ठाकरे बंधु नापास, ‘बेस्ट टेस्ट’ मध्ये हरले उद्धव-राज, वाचा निकाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.