मुंबई : कफ सिरप ( cough syrup) बनवणाऱ्या ६ कंपन्यांवर राज्य सरकारने कडक कारवाई केल्याची माहिती समोर येत आहे. खोकल्याचं औषध बनवणाऱ्या ६ कंपन्यांने परवाने निलंबित करण्यात आले आहेत. अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी ही माहिती दिली. कफ सिरप बनवणाऱ्या 108 पैकी 84 उत्पादकांची चौकशी सुरू असुन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली असल्याचे सांगितले.
[read_also content=”‘या’ दर्ग्यावर हिंदू मुस्लिम एकत्र खेळतात होळी, देशाच्या कानाकोपऱ्यातुन लोकं येतात रंगाची उधळण करायला https://www.navarashtra.com/latest-news/hindu-muslims-together-celebrate-holi-together-in-waris-ali-shah-sharif-dargah-barabanki-nrps-373919.html”]
भाजप आमदार आशिष शेलार यांच्या लक्षवेधी प्रस्तावावर उत्तर देताना अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी विधानसभेत ही माहिती दिली. उल्लेखनीय म्हणजे, उत्तर प्रदेशातील नोएडास्थित कंपनीने बनवलेले कफ सिरप प्यायल्याने गेल्या वर्षी उझबेकिस्तानमध्ये 18 मुलांचा मृत्यू झाला होता. नोएडा पोलिसांनी शुक्रवारी सांगितले की त्यांनी कंपनीच्या तीन कर्मचाऱ्यांना अटक केली आहे.
दरम्यान, अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने राज्यातील कफ सिरपच्या 108 उत्पादकांपैकी 84 विरुद्ध तपास सुरू केला आहे. त्यापैकी चार कंपन्यांचे उत्पादन बंद करण्याचे निर्देश देण्यात आले, तर सहा कंपन्यांचे परवाने निलंबित करण्यात आले. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १७ कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तर शेलार यांनी भारतातून आयात केलेले कफ सिरप कथितपणे प्यायल्याने गांबियातील 66 मुलांचा मृत्यू झाल्याचा उल्लेख केला, परंतु त्या प्रकरणात फसवणुकीच्या आरोपांचा सामना करणारी कंपनी हरियाणातील होती आणि तिचे महाराष्ट्रात कोणतेही अस्तित्व नव्हते. तेथे कोणतेही उत्पादन युनिट नव्हते, अशी माहिती राठोड यांनी दिली.