Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मरणानंतरचे सोहळे थांबवा, अनिष्ट प्रथा बदला

-हभप  भरतमहाराज थोरात यांचे आवाहन

  • By Aparna
Updated On: Nov 11, 2022 | 07:35 PM
मरणानंतरचे सोहळे थांबवा, अनिष्ट प्रथा बदला
Follow Us
Follow Us:

राजगुरूनगर : सर्वसामान्य व्यक्तीचे मरणही महाग झाले असून व्यक्ती मेल्यावर होणारा खर्च आता सर्वसामान्य माणसाच्या अवाक्याबाहेर जात आहे.  दशक्रिया वा अन्य विधी करण्यासाठी आता सर्वसामान्य कर्जबाजारी होवू लागलेत. त्यामुळे  या अनिष्ट प्रथा बदलण्याची गरज आहे,  असे प्रतिपादन  प्रवचन व कीर्तनकार हभप भरतमहाराज थोरात यांनी चास ( ता. खेड ) येथे एका कार्यक्रमात व्यक्त केले.

-माणसाच्या मृत्यनंतरचा सोहळा घातक

‘दिवसेंदिस रूढी, परंपरा यांना तिलांजली देवून नवनवीन ट्रेंड समाजात पसरताहेत.  त्यामुळे या ट्रेंडचा सर्वसामान्य व्यक्तिंना कसा त्रास होतो याविषयी भाष्य करताना हभप भरतमहाराज थोरात बोलत होते. त्यांनी सांगीतले की, माणूस मेल्यावर त्याचा सोहळा करणे घातक ठरत असून त्याचा त्रास मात्र दुःखात असलेल्या परिवाराला होत आहे. मृत  व्यक्तिंच्या घरातील लोक दुःखात  असल्याने सभोवतालची  चार माणसे जे सांगतील किंवा जे म्हणतील ते ऐकण्याची शोकाकुल  परिवाराची तयारी असते.”

-दशक्रिया निधीतून दांभिकता वाढतेय

“दशक्रिया विधी धार्मिक महत्त्व असणारा विधी अलीकडे धार्मिकतेपेक्षा, दांभिकता वाढीस लागली आहे. दशक्रिया विधी निमित्त शोकाकुल  परिवाराला होणारी आर्थिक मदत म्हणजे दुखवट्याचा प्रकार बंद करून पाकिट वाटपाची अनिष्ठ प्रथा सुरु झाली आहे. वेगवेगळ्या संस्थांना दिलेली आर्थिक मदत संबधितांपर्यंत न पोहचता त्याचा   गैरवापर होतो. पंधरा, वीस हजार भांडून घेणारा सेलिब्रिटी धंदेवाईक महाराज प्रवचनाला बोलवायचा, तर पाच हजार रुपये घेऊन सुत्रसंचालन करणारा निवेदक, असे प्रकार वाढीस लागलेले आहे. ही देण्याची प्रथा आल्याने सर्वसामान्य माणूस कर्जबाजारी होतोय. ज्यांची ऐपत असेल त्यांनी हे जरूर करावे, त्याबद्दल काही आक्षेप नाही, परंतु लोकलज्जा व लोकआग्रहास्तव गोरगरिबांना सरसकट भरडले जाते, म्हणून कधी कधी वाटतं आजकाल जगण्यापेक्षा मरणं महाग झाले.” असे थोरात महाराज म्हणाले.

-दशक्रियेच्या जेवणाचाही इव्हेंट झाला

भरतमहाराज थोरात पुढे म्हणाले,  सध्या  दशक्रियेच्या जेवणाचाही इव्हेंट झालेला असून भाऊबंदांनी केलेला स्वयंपाक आता कालबाह्य झाला आहे. आचाऱ्याला माणसांनुसार ठरवून देवून वेगवेगळे पदार्थ कसे ताटात येतील हे पाहिले जात आहे. पण यामध्ये शोकाकुल परिवाराला हस्तक्षेप करता येत नसल्याने त्यांना बघ्याची भूमीका घ्यावी लागते.

-कर्जाच्या खाईत लोटू नका
यापुढे माणसांना माणसांसाठी वेळ द्यायला शिल्लक राहिलेला नसल्याने काँट्रॅक्ट पद्धत येवून विधीही तुम्हीच करा, रडण्यासाठी माणसेही तुम्हीच आणा, दहावा, तेरावा तुम्हीच घाला फक्त आम्हाला रक्कम सांगा किती द्यायची हे सुरू होणार आहे.  यावर मात करायची असेल तर लोकांनी एकत्र या, समाजव्यवस्था ढासळणार नाही याची काळजी घ्या, ज्याला शक्य आहे त्यांनी जरूर दान करा.  मात्र, ज्याला शक्य नाही त्याला कर्जाच्या खाईत लोटू नका,” असेही ते म्हणाले.

Web Title: Stop post death ceremonies change undesirable practices nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2022 | 07:35 PM

Topics:  

  • maharashtra
  • Pune
  • Rajgurunagar
  • Western Maharashtra

संबंधित बातम्या

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात
1

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
3

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’
4

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.