Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, मुंबई महानगरसह लाखो शेतकऱ्यांना लाभ

‘वने’ हा शेरा खासगी जागेवर काढण्याचा आदेश मिळाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. नक्की हे प्रकरण काय आहे याबाबत अधिक माहिती आपण बातमीमधून घेऊया.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Nov 13, 2025 | 01:41 PM
वने शेरा काढल्यामुळे शेतकऱ्यांना मिळणार फायदा (फोटो सौजन्य - iStock)

वने शेरा काढल्यामुळे शेतकऱ्यांना मिळणार फायदा (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:
  • शेतकऱ्यांच्या खाजगी जागेवरील ‘वने’ शेरा काढा
  • सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल
  • यामधून मिळणार शेतकऱ्यांना लाभ 
ठाणेः परिसरासह महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या खाजगी जागेवर शासनाने लावलेला वने हा शेरा काढून टाकण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने नुकताच ७ नोव्हेंबर रोजी दिल्यामुळे लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या आदेशाची लवकरात लवकर अंमलबजावणी करून शेतकऱ्याचे जमिनीवरील वन ही संज्ञा कायमची काढून टाकावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी व सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी बाधित शेतकऱ्यांना जागृत केले आणि या सर्वांनी एकत्र येऊन वकिलामार्फत सर्वोच्च न्यायालयात हा खटला दाखल केला होता. 

या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्टाचा निर्णय रद्द केला. खाजगी जंगलाच्या घोषणा रद्द केल्या, महसूल नोंदी जमिनी पुन्हा मूळ मालकाच्या नावे करण्याची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले. शासनाला पुन्हा प्रक्रिया करायची असल्यास ती कायद्याने व सर्व प्रक्रिया पूर्ण करूनच करावी, असा निकाल न्यायालयाने दिला आहे अशी माहिती सह्याद्री परिसर शेतकरी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली वनविभागाचे सेवानिवृत्त अधिकारी किशोर ठाकरे, चंद्रकांत शेळके यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकत्यांनी यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. 

Pune Forest Department: वन अधिकारीच चरताहेत शासनाच्या कुरणात; पुरंदरमध्ये एक लाखांची लाच घेताना कर्मचारी रंगेहात

नक्की काय झाले

भारतीय वन अधिनियम १९२७ चे, कलम ३५ मधील तरतुदीनुसार राज्य शासनास कोणतेही खाजगी मालकीचे क्षेत्र वनसंवर्धनासाठी संपादित करता येते. याचा आधार घेऊन १९९५ साली महाराष्ट्र राज्यातील हजारो हेक्टर खाजगी जमिनीवर वने ही संज्ञा लावण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्याची खाजगी मालकीची जमीन असून सुद्धा त्यावर कोणतेही काम करता येत नव्हते. त्यावरचे झाडोरा तोडायला परवानगी मिळत नव्हती.

या निर्णयामुळे शेतकऱ्याना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयामध्ये एक सर्वोच्च 66 न्यायालयाने उचलून धरला आहे तो खुप महत्वाचा आहे. एखाद्या जामिनीला वन म्हणून जाहीर करणेसाठी जर भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ३५ (३) अंतर्गत नुसती नोटीस जरी बजावली असेल तरी ते क्षेत्र वन होते हे राज्य शासनाचे म्हणणे चुकीचे आहे. हा खरे म्हणजे फार महत्वाचा ऐतिहासिक निर्णय आहे. वर्षानुवर्षे गरीबीत पिचत पडलेल्या अडाणी दरिद्र्धी शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय आहे – किशोर ठाकरे, सेवानिवृत्त वनाधिकारी व याचिकाकर्ते 

प्रक्रिया नियमानुसार नाही

शासनाने वन अधिनियमानुसार शेतकऱ्यांच्या खाजगी मालकीच्या जमिनीवर वन संज्ञा लागू केली आहे. परंतु त्यासाठी अवलंबिण्यात येणारी कायदेशीर प्रक्रिया नियमानुसार पार पडलेली नव्हती, असे अपील करणाऱ्या शेतकऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात केलेल्या अपिलात म्हटले होते. त्याचा निकाल नुकताच लागला ५०-६० वर्षांपूर्वी काढलेली नोटीस ही आता मृत झालेली आहे व तिच्या आधारे सातबारावर वन म्हणून घेण्यात येणारी नोंद ही चुकीची आहे. शासनाने ती नोंद ताबडतोब काढून टाकावी असे स्पष्ट आदेश सवर्वोच्च्च न्यायालयाने त्या निर्णयांमध्ये दिले, असे याचिका कर्ते किशोर ठाकरे यांनी सांगितले.

मेंढपाळ वन विभाग संघर्ष शिगेला ! वनपरीक्षेत्र अधिकारी वर्षा हरणेंची धडाकेबाज कारवाई

नेमके काय प्रकरण आहे

भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ३५ (३) अन्वये महाराष्ट्र राज्यातील सुमारे २ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्राचे मालक असलेल्या ४० हजार शेतक-यांच्या नावे राज्य शासनाचे वनविभागाने सन १९५० ते १९६५ या काळात ज्या जमिनीवर झाडोरा आहे. त्यांचे ७/१२ वने अशी नोंद करण्याबाबत नोटीस काढल्या होत्या. हे क्षेत्र पूर्णपणे खाजगी मालकीचे आहे. मात्र या नोटिसा राज्य शासनाने फक्त कागदोपत्री काढल्या, प्रत्यक्षात त्या संबंधित जमीन मालकास बजावण्यात आल्याच नाहीत. मूळ जमीन मालकास अशी काही नोटीस बजावण्यात आली होती, असे आजचा त्या जमिनीचा मालक म्हणजे जुन्या मूळ जमीनदारचा मुलगा, नातू, पणतु किंवा विकत घेणारा मालक यापैकी कोणीही सांगू शकत नाही असे म्हणणे याचिकेत मांडण्यात आले होते.

Web Title: Supreme court verdict benefits to lakhs of farmers including mumbai metropolitan region

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2025 | 01:41 PM

Topics:  

  • Farmers
  • maharashtra news
  • Thane news

संबंधित बातम्या

काजू उत्पादकांच्या प्रश्नांवर विधानसभेत आवाज उठविणार; आमदार निलेश राणे यांची शेतकऱ्यांना ग्वाही
1

काजू उत्पादकांच्या प्रश्नांवर विधानसभेत आवाज उठविणार; आमदार निलेश राणे यांची शेतकऱ्यांना ग्वाही

सरकारने 49 वर्षाच्या कराराचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा…; सदाभाऊ खोत यांचा इशारा
2

सरकारने 49 वर्षाच्या कराराचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा…; सदाभाऊ खोत यांचा इशारा

संतापजनक! बाधित शेतकऱ्यांकडून आत्मदहनाचा इशारा, कुंभमेळा आयुक्तांनी केलेल्या हेटाळणीचा व्यक्त केला निषेध
3

संतापजनक! बाधित शेतकऱ्यांकडून आत्मदहनाचा इशारा, कुंभमेळा आयुक्तांनी केलेल्या हेटाळणीचा व्यक्त केला निषेध

Maharashtra Politics : टिपू सुलतान प्रकरणी ‘आ बैल मुझे मार’अशी अवस्था; वातावरण बिघडताच संजय राऊत स्पष्टच बोलले
4

Maharashtra Politics : टिपू सुलतान प्रकरणी ‘आ बैल मुझे मार’अशी अवस्था; वातावरण बिघडताच संजय राऊत स्पष्टच बोलले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.