Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी ! TET प्रश्नावर लवकरच तोडगा निघणार; सरकारकडून घेण्यात येणार ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय

सर्वोच्च न्यायालयाने सर्वच शिक्षकांसाठी टीईटी अनिवार्य केली आहे. ज्या शिक्षकांनी टीईटी परीक्षा उत्तीर्ण केली नसेल त्यांना सेवेतून कमी केले जाणार आहे. त्यामुळे २० ते २५ वर्षे सेवा देणाऱ्या शिक्षकांची मोठी अडचण होणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 12, 2025 | 11:37 AM
TET प्रश्नावर लवकरच तोडगा निघणार; सरकारकडून घेण्यात येणार 'हा' महत्त्वपूर्ण निर्णय

TET प्रश्नावर लवकरच तोडगा निघणार; सरकारकडून घेण्यात येणार 'हा' महत्त्वपूर्ण निर्णय

Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य करण्यात आले आहे. जर ही परीक्षा उत्तीर्ण नसेल तर शिक्षकांच्या नोकरीवर गदा येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याच निर्णयाच्या विरोधात शिक्षक संघटनांकडून जोरदार विरोध केला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने सर्व शिक्षकांसाठी टीईटी अनिवार्य केल्याने अनेक शिक्षकांची अडचण होणार आहे. यावर तोडगा काढण्यासाठी शिक्षकांची एक समिती गठीत करणार असल्याची घोषणा शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी गुरुवारी विधान परिषदेत केली.

सर्वोच्च न्यायालयाने सर्वच शिक्षकांसाठी टीईटी अनिवार्य केली आहे. ज्या शिक्षकांनी टीईटी परीक्षा उत्तीर्ण केली नसेल त्यांना सेवेतून कमी केले जाणार आहे. त्यामुळे २० ते २५ वर्षे सेवा देणाऱ्या शिक्षकांची मोठी अडचण होणार आहे. किरण सरनाईक यांनी याबाबतचा मुद्दा लक्षवेधीच्या माध्यमातून विधान परिषदेत मांडला. त्यावर उत्तर देताना शिक्षण राज्यमंत्री भोयर यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून टीईटीचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा विचार शासनाचा होता. परंतु, विधी व न्याय विभागाने हे करता येणार नसल्याचे सांगितले. या विषयावर सरकारकडून सकारात्मक उत्तर न मिळाल्याने विरोधी पक्षातील आमदारांनी सभात्याग केला.

हेदेखील वाचाल : सेवारत शिक्षकांसाठी नवे निकष कशाला? शिक्षक संघटनांचा सवाल; शिक्षक पात्रतापूर्ण नाहीत काय ?

दरम्यान, विक्रम काळे यांनी महाअधिवक्त्यांशी चर्चा करण्याच्या सूचना केली. अनेक शिक्षक व शिक्षक संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली असून, ती मान्य होईपर्यंत अंमल न करण्याची विनंती अभिजित वंजारी यांनी केली.

निवृत्तीला 5 वर्षे शिल्लक राहिलेल्या शिक्षकांना दिलासा

भोयर यांनी अंमलबजावणी लांबणीवर टाकण्यास नकार देत महाअधिवक्त्यांशी चर्चा करण्यास समर्थन दिले. तसेच निवृत्तीला 5 वर्षे शिल्लक राहिलेल्या शिक्षकांच्या पदोन्नतीच्या विषयावर परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट केले. परंतु, विरोधक टीईटीवर ठोस तोडगा निर्णय देण्यावर ठाम होते. भोयर यांच्याकडून सकारात्मक उत्तर न मिळाल्याने विरोधकांनी सभात्याग केला.

2013 पूर्वी रुजू झालेल्या सर्व शिक्षकांना अनिवार्यतेतून सूट

२०१३ पूर्वी शिक्षक म्हणून रुजू झालेल्या सर्व शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्यतेतून सूट द्यावी, अशी ठाम मागणी बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षक सभेने राज्य शासनाकडे केली आहे. या संदर्भातील निवेदन शिक्षक सभेने मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले आहे. शिक्षक सभेचे म्हणणे आहे की, २०१३ पूर्वी सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांची भरती त्यावेळच्या शासन धोरणानुसार करण्यात आली होती. नियुक्तीपूर्वी त्यांनी आवश्यक त्या पात्रता परीक्षा उत्तीर्ण केल्या असून गुणवत्तेच्या आधारेच त्यांची निवड झालेली आहे. त्यामुळे अशा शिक्षकांना आता नव्याने शिक्षक पात्रता परीक्षा देण्यास सक्ती करणे अन्यायकारक आणि अयोग्य आहे, असे मत शिक्षक सभेने व्यक्त केले आहे.

हेदेखील वाचा : कारंजा तालुक्यात शाळा बंद आंदोलन; ३४० शिक्षकांचा सहभाग, वेतनकपातीच्या इशाऱ्याने संताप

 

Web Title: Tet issue will be resolved soon important decision to be taken by the government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2025 | 11:37 AM

Topics:  

  • Dr. Pankaj Bhoyar
  • maharashtra news
  • TET Exam

संबंधित बातम्या

Thane : वाढती महागाई, इंधन दरवाढविरोधात जितेंद्र आव्हाडांचा महायुतीला टोला
1

Thane : वाढती महागाई, इंधन दरवाढविरोधात जितेंद्र आव्हाडांचा महायुतीला टोला

खासगी शाळेत टीईटी पात्र शिक्षक किती? लवकरच होणार पडताळणी; शिक्षण विभागाचे संकेत
2

खासगी शाळेत टीईटी पात्र शिक्षक किती? लवकरच होणार पडताळणी; शिक्षण विभागाचे संकेत

Ahilyanagar : अहिल्यानगरचा होणार कायापालट ? विकासकामांसाठी 15 कोटींचा निधी मंजूर
3

Ahilyanagar : अहिल्यानगरचा होणार कायापालट ? विकासकामांसाठी 15 कोटींचा निधी मंजूर

Satara News : माणमधील ग्रामपंचायतींकडून शासन आदेशाला केराची टोपली; लोगो नसल्याने चर्चेला उधाण
4

Satara News : माणमधील ग्रामपंचायतींकडून शासन आदेशाला केराची टोपली; लोगो नसल्याने चर्चेला उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.