
फोटो सौजन्य- chatgpt
बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या नोंदीनुसार, संपूर्ण जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ४८.७५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यात अंबरनाथ तालुक्यात ५२ मिमी आणि उल्हासनगरमध्ये ४१ मिमी पाऊस बरसला आहे. दुसरीकडे, ठाणे तालुक्यात सर्वाधिक ७० मिमी आणि मीरा-भाईंदरमध्ये ६७ मिमी पावसाची नोंद झाली असताना, भिवंडीत सर्वात कमी म्हणजेच केवळ २६ मिमी आणि कल्याणमध्ये ३० मिमी पाऊस पडला आहे. चालू पावसाळ्यातील आतापर्यंतच्या एकूण पावसाचा विचार केल्यास जिल्ह्याची आजवरची पावसाची सरासरी ४७.०६ टक्के इतकी झाली आहे.
धरणांतील या आशादायक चित्रामुळे भविष्यातील पाणीटंचाईचे संकट दूर झाले आहे. यासोबतच, नद्यांची स्थितीही सध्या पूर्णपणे सुरक्षित आहे. बदलापूरमधून वाहणाऱ्या उल्हास नदीची पातळी १४.५० मीटर, अंबरनाथमधील जांभूळपाडा येथे १२.४० मीटर आणि मोहने येथे ७.०० मीटर इतकी नोंदवली गेली असून या सर्व नोंदी धोका आणि इशारा पातळीपेक्षा बऱ्याच खाली आहेत
पावसाचे प्रमाण सर्वत्र एकसमान नसले तरी, बारवी पाठोपाठ जिल्ह्यातील इतर प्रमुख धरणामध्येही मुबलक पाणीसाठा जमा झाला आहे. शहापूर तालुक्यातील तानसा धरण ९७.९६ टक्के भरले असून त्यात १४२.१२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा जमा झाला आहे, तर मोडक सागर धरणही ९०.१२ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. याशिवाय, मोठ्या क्षमतेच्या भातसा धरणात ६७.४८ टक्के उपयुक्त पाणीसाठा जमा झाला आहे.
जिल्ह्यात पावसाचे प्रमाण सर्वत्र समान नसले तरी धरणांमध्ये सातत्याने वाढणारा पाणीसाठा ही सकारात्मक बाब मानली जात आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी भविष्यातील पाणीटंचाईची चिंता मोठ्या प्रमाणात कमी झाली असून, प्रशासनही आगामी पाणीपुरवठ्याबाबत अधिक आश्वस्त झाले आहे.
Ans: बारवी धरणातील उपयुक्त पाणीसाठा सध्या सुमारे ५९.२५ टक्के झाला आहे.
Ans: बारवी धरणातून अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली तसेच ठाणे जिल्ह्यातील अनेक भागांना पाणीपुरवठा केला जातो.
Ans: पाणीटंचाईची शक्यता कमी होऊन आगामी काळात नियमित पाणीपुरवठा होण्यास मदत होईल.