Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शहरातील समस्या सोडवण्यासाठी काँग्रेसचा मोठा निर्णय; 20 तारखेपासून ‘या’ मोहिमेची होणार सुरुवात

शहराच्या गरजा लक्षात घेऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने शहर परिवर्तन गट सुरु केला असून या मोहिमेचे उद्घाटन २० ऑगस्ट रोजी सर्व महानगरपालिका क्षेत्रात होणार आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 18, 2026 | 04:12 PM
शहरातील समस्या सोडवण्यासाठी काँग्रेसचा मोठा निर्णय; 20 तारखेपासून 'या' मोहिमेची होणार सुरुवात

शहरातील समस्या सोडवण्यासाठी काँग्रेसचा मोठा निर्णय; 20 तारखेपासून 'या' मोहिमेची होणार सुरुवात

Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्यात शहरीकरण झपाट्याने वाढत आहे पण वाढत्या शहरीकरणासाठी पायाभुत सोयी सुविधा पुरवण्यात सरकार कमी पडत आहे. योग्य नियोजन नसल्यामुळे आजही शहरे बकाल बनली आहेत. चांगले रस्ते, पिण्याचे शुद्ध पाणी, आरोग्य सुविधा, शिक्षण, कचरा व्यवस्थापन, वाहतूक कोंडी, पार्किंग, प्रदुषण यासह अनेक समस्यांना जनतेला तोंड द्यावे लागत आहे. राज्य सरकार व महापालिका प्रशासन शहर विकासाच्या नावाखाली फक्त कोट्यवधी रुपयांचा निधी लाटण्याचे काम करत आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे. शहराच्या गरजा लक्षात घेऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने शहर परिवर्तन गट सुरु केला असून या मोहिमेचे उद्घाटन २० ऑगस्ट रोजी सर्व महानगरपालिका क्षेत्रात होणार आहे.

शहर परिवर्तन गटाचे अध्यक्ष म्हणून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव तेलंगणाचे सहप्रभारी व वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर संग्राम खोपडे हे या गटाचे समन्वय आहेत. माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्यातील सर्व महानगरपालिका क्षेत्रात जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन शहर परिवर्तन गटाच्या कार्यक्रमाची रुपरेषा जाहीर केली जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने दिली आहे.

हे सुद्धा वाचा : नाशिक हादरलं ! नवीन प्रियकराच्या मदतीने पार्टनरचा काढला काटा; मृतदेह कसारा घाटात नेला अन्…

भाजपाने सुरु केलेला अपप्रचार थांबवावा- हर्षवर्धन सपकाळ  

वंदे मातरम राष्ट्रगितावरून भारतीय जनता पक्ष राजकारण करत आहे हे अत्यंत हास्यास्पद आहे. वंदे मातरम हे १८९६ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात पहिल्यांदा गायले गेले व तर २४ जानेवारी १९५० रोजी ते देशाचे राष्ट्रीयगीत म्हणून स्वीकारण्यात आले. गुरुदेव रविंद्रनाथ टागोर, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभाई पटेल, सुभाषचंद्र बोस, मौलाना आझाद यांच्या उपस्थितीत याचा निर्णय झालेला असून काँग्रेसच्या प्रत्येक अधिवेशनात व कार्यक्रमात ते गायिले जाते. भारतीय जनता पक्षाकडून एक व्हिडिओ प्रसारित करून काँग्रेसविरोधात अपप्रचार केला जात आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना जास्त वेळ उभा राहता येत नाही ये लक्षात घेऊन सोनियाजी गांधी काही सुचना करत आहेत परंतु भाजपा कडून मात्र वंदे मातरमचा अपमान केल्याचा अपप्रचार केला जात आहे, हा अपप्रचार थांबवावा. वंदे मातरम बद्दल भाजपाने काँग्रेसला शिकवण्याची गरज नाही, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

Web Title: The congress has taken a major decision to resolve the citys problems

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 04:12 PM

Topics:  

  • Congress
  • Harshvardhan Sapkal
  • sachin sawant

संबंधित बातम्या

MMRDA अभियांत्रिकी भरती परीक्षेवर काँग्रेसचा गंभीर आरोप; उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी
1

MMRDA अभियांत्रिकी भरती परीक्षेवर काँग्रेसचा गंभीर आरोप; उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी

अवमानाची लढाई आमने-सामने; लातुरात काँग्रेस विरुद्ध भाजप युवा मोर्चाचे जोरदार आंदोलन
2

अवमानाची लढाई आमने-सामने; लातुरात काँग्रेस विरुद्ध भाजप युवा मोर्चाचे जोरदार आंदोलन

बारामतीत भाजप युवा मोर्चा आक्रमक! काँग्रेस कार्यालयासमोर ‘वंदे मातरम्’च्या घोषणा
3

बारामतीत भाजप युवा मोर्चा आक्रमक! काँग्रेस कार्यालयासमोर ‘वंदे मातरम्’च्या घोषणा

‘दिमागी नक्षलवाद’च्या टीकेवरून फडणवीस-सपकाळ आमनेसामने; सोनिया गांधींच्या व्हिडिओवरून राजकारण तापले
4

‘दिमागी नक्षलवाद’च्या टीकेवरून फडणवीस-सपकाळ आमनेसामने; सोनिया गांधींच्या व्हिडिओवरून राजकारण तापले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.