Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri News: मत्स्य व्यवसायाला हवामान बदलाचा फटका; भाव २५-३० टक्क्यांनी वाढले

बंदरात मासळीचे दर १०० रुपयांपासून बेट १२०० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातही मासळीची टंचाई निर्माण झाली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 02, 2026 | 01:54 PM
Ratnagiri News: मत्स्य व्यवसायाला हवामान बदलाचा फटका; भाव २५-३० टक्क्यांनी वाढले

Ratnagiri News: मत्स्य व्यवसायाला हवामान बदलाचा फटका; भाव २५-३० टक्क्यांनी वाढले

Follow Us
Close
Follow Us:

करंजा-द्रोणागिरी बंदरात मासळीची आवक घटली
परंपरागत आहार असलेल्या मासळीसाठी जादा पैसे
भाव २५-३० टक्क्यांनी वाढले

गुहागर: वाढते वादळी वारे, सतत बदलणारे हवामान आणि समुद्रातील प्रतिकूल परिस्थिती यांचा थेट परिणाम मासेमारी व्यवसायावर होत असून, मासळीच्या आवकेत लक्षणीय घट झाली आहे. यामुळे घाऊक व किरकोळ बाजारात मासळीच्या दरात २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली असून, आधीच भाज्यांच्या वाढलेल्या दरांनी त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांचे मासिक बजेट अधिकच कोलमडू लागले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मिरकर वाडा आणि हरणई या बंदरांसह उरण तालुक्यातील करंजा, मोरा, दिघोडे, आवरे या किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणावर खोल समुद्रातील मासेमारी केली जाते.

करंजा येथे नव्याने सुरू झालेल्या करंजा-द्रोणागिरी मत्स्य व्यवसाय बंदरात सध्या मासळीची आवक घटलेली दिसून येत आहे. सायंकाळच्या सुमारास भरणाऱ्या बाजारात करंदी, कोलंबी, पापलेट, सुरमई, रावस, कलेट, हलवा, कुपा, बोबील आदी सुमारे ३० ते ४० प्रकारचे मासे विक्रीसाठी उपलब्ध असले, तरी त्याचे प्रमाण मर्यादित आहे. या बंदरात मासळीचे दर १०० रुपयांपासून बेट १२०० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातही मासळीची टंचाई निर्माण झाली आहे.

Malvan News: मच्छीमार आंदोलन: ९३ आरोपीची मुक्तता; 10 वर्षांपासून सुरू होता खटला

मात्र पापलेट, सुरमई, कोलंबी, कुषा आणि कलेट या माशांना मोठी मागणी असल्याने त्यांचे दर अधिक कडाडले आहेत. रायगडच्या खोल समुद्रातील मासळी, पापलेट आणि सुरमई हे खवय्यांचे आवडते मासे मानले जातात. मात्र सध्या या माशांचे दर गगनाला भिडल्याने खवय्यांना खाण्यावर मुरड घालावी लागत आहे. एका पापलेटच्या नगासाठी १२०० ते १४०० रुपये, सुरमईसाठी ८५० ते १००० रुपये किलो, कोलंबीसाठी ४५० ते ५०० रुपये, तर हलव्यासाठी ५०० ते ५५० रुपये मोजावे लागत आहेत. सागरी किनाऱ्यावरील हजारो मासेमारी बोटी बंदरातच नांगरून ठेवण्यात आल्या असून, समुद्रात जाणे धोकादायक ठरत आहे.

मच्छीमार व्यवसायाकरिता अद्ययावत, प्रशस्त जेट्टीची मागणी; मंत्री नितेश राणेंना दिले निवेदन

परंपरागत आहार असलेल्या मासळीसाठी जादा पैसे

उरण परिसरातील खाडीकिनाऱ्यावर पूर्वी निवटे, खरख्या खुबे, माकोल, कोळीम, ताजी कोलंबी यांसारखी स्थानिक मासळी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असे. मात्र सध्या या स्थानिक माशांचे प्रमाणही घटल्याने दरात प्रचंड वाढ झाली आहे, परंपरागत आहार असलेल्या मासळीकरिता आता जादा पैसे मोजावे लागत आहेत, अशी प्रतिक्रिया खवय्यांनी व्यक्त केली. हवामान स्थिर झाल्यानंतरच मासळीच्या बाजारात दिलासा मिळेल, अशी आशा व्यापारी आणि ग्राहक दोघेही व्यक्त करत आहेत.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: The fishing industry is being hit hard by climate change guhagar ratnagiri news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 01:54 PM

Topics:  

  • Fish market
  • Maharashtra Weather
  • Ratnagiri

संबंधित बातम्या

Maharashtra Weather : कुठे प्रचंड उष्णता तर कुठे मुसळधार पाऊस; ‘या’ ६ जिल्ह्यांसाठी रेड-ऑरेंज अलर्ट
1

Maharashtra Weather : कुठे प्रचंड उष्णता तर कुठे मुसळधार पाऊस; ‘या’ ६ जिल्ह्यांसाठी रेड-ऑरेंज अलर्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.