रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील दहिवली येथे दरड कोसळून तीन जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची गंभीर घटना घडली. प्रशासन आणि एनडीआरएफच्या संयुक्त प्रयत्नांतून एका व्यक्तीला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले असले, तरी अन्य दोन जण अद्याप बेपत्ता आहेत. ढिगाऱ्याखाली दाबले गेल्यामुळे त्यांच्या जिवंत असण्याची शक्यता कमी असल्याचे एनडीआरएफने सांगितले असून शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना शासनाकडून तातडीने ४ लाख रुपयांची मदत देण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले. कशेडी परिसरातील भूस्खलनग्रस्त भागाची पाहणी करताना त्यांनी लँडस्लाईडच्या मूळ कारणांचा सखोल अभ्यास करून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जातील, असे स्पष्ट केले. तसेच चिपळूणमधील पूरस्थिती आता नियंत्रणात असून नागरिकांचे जीवन सुरक्षित करण्यात प्रशासनाला यश आल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी विरोधकांकडून होत असलेल्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर देत, तथ्यांची पडताळणी न करता आरोप केले जात असल्याचा टोला लगावला.
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील दहिवली येथे दरड कोसळून तीन जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची गंभीर घटना घडली. प्रशासन आणि एनडीआरएफच्या संयुक्त प्रयत्नांतून एका व्यक्तीला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले असले, तरी अन्य दोन जण अद्याप बेपत्ता आहेत. ढिगाऱ्याखाली दाबले गेल्यामुळे त्यांच्या जिवंत असण्याची शक्यता कमी असल्याचे एनडीआरएफने सांगितले असून शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना शासनाकडून तातडीने ४ लाख रुपयांची मदत देण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले. कशेडी परिसरातील भूस्खलनग्रस्त भागाची पाहणी करताना त्यांनी लँडस्लाईडच्या मूळ कारणांचा सखोल अभ्यास करून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जातील, असे स्पष्ट केले. तसेच चिपळूणमधील पूरस्थिती आता नियंत्रणात असून नागरिकांचे जीवन सुरक्षित करण्यात प्रशासनाला यश आल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी विरोधकांकडून होत असलेल्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर देत, तथ्यांची पडताळणी न करता आरोप केले जात असल्याचा टोला लगावला.