Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Purandar Airport : ‘पुरंदर’ प्रकरणी शेतकऱ्यांची थट्टा! हरकती नोंदवणारे अधिकारी गैरहजर

पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, पारगाव या सात गावांमध्ये २८३२ हेक्टर क्षेत्रावर विमानतळासाठी भूसंपादन करण्यात येत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 27, 2025 | 05:41 PM
‘पुरंदर’ प्रकरणी शेतकऱ्यांची थट्टा! हरकती नोंदवणारे अधिकारी गैरहजर

‘पुरंदर’ प्रकरणी शेतकऱ्यांची थट्टा! हरकती नोंदवणारे अधिकारी गैरहजर

Follow Us
Close
Follow Us:

सासवड : महाराष्ट्र शासनाने पुरंदरमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला असून त्यासंबंधीचे काम वेगाने सुरू आहे. मात्र, या प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेमुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांची शासनाकडून चेष्टा केली जात असल्याचे चित्र उभे राहत आहे. शासनाने प्रकल्पबाधित शेतकऱ्यांकडून हरकती मागवण्यासाठी नियुक्त केलेले अधिकारी वेळेवर उपलब्ध नसल्याने, आणि कार्यालयांमध्ये हरकती स्वीकृतीसाठी पुरेशा सुविधा नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

शासनाचे आवाहन, पण अधिकारी गायब

पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, पारगाव या सात गावांमध्ये २८३२ हेक्टर क्षेत्रावर विमानतळासाठी भूसंपादन करण्यात येत आहे. शासनाच्या यंत्रणेने शेतकऱ्यांच्या हरकती मागण्यासाठी नोटीसा दिल्या असल्या तरी प्रत्यक्षात त्या हरकती स्वीकारणारे अधिकारीच कार्यालयांमध्ये उपस्थित नसल्याने हे आवाहन केवळ कागदोपत्रीच मर्यादित राहिले आहे. शेतकऱ्यांनी वेळेत हरकती सादर करण्यासाठी प्रयत्न केल्यावर त्यांना तिथे कोणी अधिकारी न भेटल्याने तीव्र असंतोष व्यक्त करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांनी एकत्र येत आपापल्या हरकती जमा करून कार्यालयांमध्ये जमा करण्यासाठी तयारी केली आहे. मात्र अधिकारी अनुपस्थित असल्याने त्यांचा संयम सुटत चालला आहे. शासनाने मुदत दिली असून नंतर हेच अधिकारी “शेतकरी सहकार्य करत नाहीत” असा अहवाल वरिष्ठांकडे सादर करतील, अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.

ड्रोन सर्व्हे, लाठी हल्ल्यानंतरही प्रक्रिया सुरूच

शासनाने यापूर्वी पोलीस बंदोबस्तात ड्रोन सर्व्हे करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र शेतकऱ्यांनी त्याला जोरदार विरोध करत तो हाणून पाडला. परिणामी पोलिसांकडून लाठीहल्ला करण्यात आला आणि शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व्हे रद्द केल्याची घोषणा केली. मात्र दुसरीकडे, भूसंपादनाची प्रक्रिया शांतपणे सुरूच आहे.

एका कर्मचाऱ्यावर चार गावांचा भार

वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण गावांसाठी उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे, पारगावसाठी अतिरिक्त उपजिल्हाधिकारी संगीता चौगुले, तर उर्वरित गावांसाठी प्रांताधिकारी वर्षा लांडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्यक्षात या गावांमध्ये हरकती स्वीकारण्यासाठी केवळ एक महिला कर्मचारी कार्यरत आहे विद्या गायकवाड. त्यामुळे नियोजित वेळेत सर्व शेतकऱ्यांच्या हरकती स्वीकारल्या जातील की नाही, हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचा हस्तक्षेप अपेक्षित

या साऱ्या प्रकरणाबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांना विचारणा करण्यात आली असता, त्यांनी परिस्थितीची माहिती घेऊन तातडीने कारवाई करण्यात येईल असे सांगितले. मात्र केवळ आश्वासने पुरेसे नाहीत. शेतकऱ्यांच्या भावना, त्यांचा विरोध, आणि त्यांची अडचण लक्षात घेता, प्रशासनाने तात्काळ पावले उचलणे आवश्यक आहे.

Web Title: The government is mocking farmers over the purandar airport issue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2025 | 05:39 PM

Topics:  

  • ajit pawar
  • CM Devedra Fadnavis
  • Cmomaharasahtra
  • Farmers
  • Purandar Airport

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
1

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण सोहळा संपन्न
2

‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण सोहळा संपन्न

पुणे-नाशिक महामार्गावरील पेट्रोल पंपावर दरोडा; चोरट्यांनी हवेत गोळीबार केला अन्…
3

पुणे-नाशिक महामार्गावरील पेट्रोल पंपावर दरोडा; चोरट्यांनी हवेत गोळीबार केला अन्…

पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी संकटात; शरद पवारांनी सरकारकडे केली ‘ही’ मोठी मागणी
4

पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी संकटात; शरद पवारांनी सरकारकडे केली ‘ही’ मोठी मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.