Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यातील 15 साखर कारखान्यांना जप्तीच्या नोटीसा; साखर आयुक्तांचा दणका

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ठरलेल्या मुदतीत एफआरपी रक्कम न दिलेल्या 15 साखर कारखान्यांना जप्तीच्या नोटीसा पाठवल्या आहेत. संबंधित कारखान्यांकडून 246 कोटी 45 लाख रुपयांची थकबाकी आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 10, 2025 | 12:49 PM
राज्यातील 15 साखर कारखान्यांना जप्तीच्या नोटीस; साखर आयुक्तांचा दणका

राज्यातील 15 साखर कारखान्यांना जप्तीच्या नोटीस; साखर आयुक्तांचा दणका

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : राज्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. साखर आयुक्तांनी राज्यातील १५ काखर कारखान्यांना दणका दिला आहे. राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ठरलेल्या मुदतीत एफआरपी रक्कम न दिलेल्या 15 साखर कारखान्यांना जप्तीच्या नोटीसा पाठवल्या आहेत. संबंधित कारखान्यांकडून 246 कोटी 45 लाख रुपयांची थकबाकी आहे.

सोलापूर जिल्ह्यातील 10, अहमदनगर जिल्ह्यातील 2, सातारा जिल्ह्यातील 2 आणि छत्रपती संभाजीनगरमधील 1 अशा एकूण 15 साखर कारखान्यांचा नोटीस पाठवली आहे. एफआरपी थकवणं हे कायद्यानुसार शिक्षेस पात्र असून, यासंदर्भात रेव्हेन्यू रिकव्हरी सर्टिफिकेट (RRC) जारी करण्यात आले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडे वसुलीची जबाबदारी

साखर आयुक्तालयाने RRC नोटीस बजावल्यानंतर, संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना जप्तीची कारवाई करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. जर संबंधित कारखान्यांनी दिलेल्या मुदतीत थकबाकी भरली नाही, तर जिल्हाधिकारी जप्तीची कारवाई करणार आहेत. थकबाकी भरल्यानंतरच कारखाना आयुक्तालयाकडे अर्ज करून RRC नोटीस रद्द करू शकतो.

शेतकऱ्यांना न्यायालयाचा दिलासा

गेल्या काही दिवसाखाली उच्च न्यायालयाने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. शेतकऱ्यांना एक रक्कमी एफआरपीची रक्कम देण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. शेतकऱ्यांना ऊसाची एफआरपी एक रक्कमीच द्या, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. राज्य शासनाचा यासंदर्भातला आदेश मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी लढणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस बिलाची एफआरपी टप्प्याटप्प्याने देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता. मात्र, आता न्यायालयाने शासनाचा हा निर्णय रद्द ठरवला आहे. हायकोर्टाच्या या निर्णयामुळे राज्यभरातील ऊस शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राजू शेट्टींचा इशारा

राज्यातील थकीत एफआरपीबाबत राजू शेट्टी यांनीगेल्या काही दिवसाखाली पुणे येथे साखर आयुक्त यांची भेट घेतली होती. यावेळी थकीत एफआरपी बरोबरच काटामारी, रिकव्हरी चोरी, वजनकाटे ॲानलाइन करणे, तोडणी वाहतुकीचा खर्च अंतरावर निर्देशात करण्यात यावा, थकीत एफआरपी १५ टक्के व्याजासह वसूल करण्यात यावे, राज्यातील साखर कारखान्यांचे शासकीय लेखा परिक्षकाकडून लेखा परिक्षण करण्यात यावे, यासह विविध मुद्यावर चर्चा करण्यात आली. येत्या आठ दिवसात साखर आयुक्तांनी राज्यातील सर्व उस उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत ७ हजार कोटी रूपये १५ टक्के व्याजासह देण्यासंदर्भात साखर कारखान्यांवर आरआरसी अंतर्गत कारवाई न केल्यास साखर आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढणार असल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला होता. आता साखर आयुक्तांनी कारखान्यांना नोटीसा पाठवल्या आहेत.

Web Title: The sugar commissioner has issued seizure notices to 15 sugar factories in the state nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2025 | 12:43 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • maharashtra
  • Sugarcane

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
1

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा
2

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!
3

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!

महाराष्ट्रात वाघ आणि बिबट्यांचे हल्ले सुरूच, ३ वर्षांत १७,०४४ जणांचा मृत्यू, वाघांच्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक
4

महाराष्ट्रात वाघ आणि बिबट्यांचे हल्ले सुरूच, ३ वर्षांत १७,०४४ जणांचा मृत्यू, वाघांच्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.