Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘हा तर मुंबई तोडण्याचा डाव, भाजपाच्या पोटातलं ओठावर आलं’, मुंबई महापालिका निवडणुकांपूर्वी उद्धव ठाकरेंचा घणाघात

शिवसेना सातत्यानं भाजपाला मुंबई तोडायची आहे, हे सांगतेय, त्यावर कर्नाटकच्या भाजपाच्याच मंत्र्यांनी शिक्कामोर्तब केल्याचंही त्यांनी म्हटलय. मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी मतदारांना किमान यांचा डाव तरी समजला असंही उद्धव ठाकरे म्हणालेत.

  • By Amrut Sutar
Updated On: Dec 29, 2022 | 03:01 PM
‘हा तर मुंबई तोडण्याचा डाव, भाजपाच्या पोटातलं ओठावर आलं’, मुंबई महापालिका निवडणुकांपूर्वी उद्धव ठाकरेंचा घणाघात
Follow Us
Close
Follow Us:

नागपूर– कर्नाटकच्या मंत्र्यांनी मुंबई हा केंद्रशासित प्रदेश करावा, ही मागणी म्हणजे भाजपाच्या पोटातलं ओठावर आल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलीय. शिवसेना सातत्यानं भाजपाला मुंबई तोडायची आहे, हे सांगतेय, त्यावर कर्नाटकच्या भाजपाच्याच मंत्र्यांनी शिक्कामोर्तब केल्याचंही त्यांनी म्हटलय. मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी मतदारांना किमान यांचा डाव तरी समजला असंही उद्धव ठाकरे म्हणालेत. मुंबईकरांना मुंबई कुणामुळे सुरक्षित आहे, हे चांगले ठाऊक असल्याचं उद्धव म्हणालेत. मुंबई केंद्रशासि करा, या कर्नाटकच्या मंत्र्यांच्या मागणीचा मुद्दा आता मुंबई महापालिका निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा होण्याची शक्यता आहे.

[read_also content=”घोटाळेबाज मंत्र्यांवर काय कारवाई करणार की क्लीन चिट देणार? उद्धव ठाकरे यांचा संतप्त सवाल, म्हणाले… https://www.navarashtra.com/maharashtra/what-action-will-be-taken-against-scam-ministers-or-will-they-give-a-clean-chit-uddhav-thackeray-angry-question-said-357870.html”]

कर्नाटकच्या मंत्र्यांच्या वादग्रस्त गणीचे पडसाद गेले दोन दिवस हिवाळी अधिवेशनात उमटत आहेत. मुंबई आमच्या बापाची आहे, तिला कुणीही धक्काही लावू शकत नाही असं उत्तर सत्ताधारी आणि विरोधकांनी कर्नाटकला दिलय. यावर भाष्य करताना उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधलाय. दरम्यान, घोटाळेबाज मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी ठाकरे गट आक्रमक झाला आहे. आज ठाकरे गटाचेप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत, शिंदे गटातील घोटाळेबाज मंत्री तसेच सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

दोन आठवडे हिवाळी अधिवेशन सुरु आहे,  सत्ताधाऱ्यांना विरोधकांनी घाम फोडलाय, महाराष्ट्राच्या जनतेला काय दिलं, याचं उत्तर दिलं पाहिजे. ५२ हजार कोटींच्या पुरवण्या मागण्यांना मान्यता, याची अंमलबजावणी कशी होणार, याची अनिश्चितता आहे. रोज एक-एक मंत्र्यांच्या घोटाळ्यांबाबत आरोप झालेले आहेत. आरोपांची गंभीरता लक्षात घेऊन मंत्र्यांचे राजीनामे घेतले गेले नाहीत. गेल्या ६ महिन्यांत सरकार काय करतंय, हे लोकांसमोर आलंय का? घोटाळेबाज मंत्र्यांचे राजीनाम घेणार की, क्लिन चीट देणार, असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरेंनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

Web Title: This is a plan to break mumbai bjp leaders stomach has come to the lips uddhav thackeray attack before the mumbai municipal elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2022 | 03:01 PM

Topics:  

  • BJP
  • Nagpur
  • Shinde-Fadnavis government
  • Winter Assembly Session

संबंधित बातम्या

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू
1

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
2

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
3

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा
4

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.