Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आंबेगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाची दमदार हजेरी; आंबा आणि भाजीपाला पिकांना फटका

अनेक शेतकऱ्यांनी शेतात कांदा काढून ठेवला असून, जोरदार पावसामुळे कांदा खराब होऊ नये म्हणून शेतकरी काढलेला कांदा सुरक्षित ठेवण्याचा प्राधान्याने प्रयत्न करत असल्याचे दिसून येते.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 17, 2025 | 11:37 AM
मराठवाड्यातही पाऊस

मराठवाड्यातही पाऊस

Follow Us
Close
Follow Us:

रांजणी : आंबेगाव तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून विविध भागात जोरदार पाऊस पडत आहे. शुक्रवारी सकाळपासून तालुक्याच्या पूर्व भागात ढगाळ वातावरण होते. मात्र, दुपारनंतर पावसाने दमदार हजेरी लावली. अचानक झालेल्या वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी वीज गायब झाल्याच्या घटना घडल्या. तर आंबा आणि भाजीपाला पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले.

तालुक्याच्या पूर्व भागातील रांजणी, वळती, थोरांदळे, चांडोली बु., नागापूर, गांजवेवाडी, जाधववाडी, लौकी आदी परिसरात शुक्रवारी दुपारी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शेतात काढून ठेवलेला कांदा मोठ्या प्रमाणात भिजला तर अनेक ठिकाणी आंबे आणि भाजीपाला पिकाचे नुकसान झाले. अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाल्याचे चित्रही पाहायला मिळाले.

सतत दोन ते तीन तास मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडल्याने ओढ्या-नाल्यांना पाण्याचा पूर आला होता. पावसामुळे अनेक भागात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पावसामुळे तापमानात देखील घट झाली असून, उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात अवकाळी पाऊस पडत आहे. परंतु, शुक्रवारी झालेल्या जोरदार अवकाळी पावसाने शेतीचे बांध फुटून अनेक ठिकाणी शेतीचे प्रचंड नुकसान झाले. ओढ्या नाल्यांना पूर आल्याचे चित्र गेल्या दहा वर्षात यावेळी प्रथमच पाहायला मिळाले. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास तालुक्याच्या पूर्व भागात पावसाला सुरुवात झाल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली.

यंदा प्रथमच मान्सूनपूर्व पावसाने लावली दमदार हजेरी 

आंबेगाव तालुक्यात गेल्या दहा वर्षांत यंदा प्रथमच मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावल्याने भविष्यकाळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. दरम्यान, अनेक शेतकऱ्यांनी शेतात कांदा काढून ठेवला असून, जोरदार पावसामुळे कांदा खराब होऊ नये म्हणून शेतकरी काढलेला कांदा सुरक्षित ठेवण्याचा प्राधान्याने प्रयत्न करत असल्याचे दिसून येते. एकूणच गेले दोन दिवस तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आगामी काळात खरिपातील कामांना वेग येण्याची शक्यता वर्तवली जाते.

आंबा पीक धोक्यात येण्याची शक्यता 

तालुक्यातील अनेक गावांना मुसळधार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे यावर्षी प्रथमच शेतमाळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले. या पावसामुळे आंबा पीक धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जाते.

Web Title: Thunderstorms occur in ambegaon taluka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2025 | 11:37 AM

Topics:  

  • Climate Change
  • Pune Rain News
  • Weather Update

संबंधित बातम्या

India Rain Alert: मोठे संकट येणार! जून महिन्यातच मान्सूनवर…; प्रशांत महासागराच्या तापमानात वाढ
1

India Rain Alert: मोठे संकट येणार! जून महिन्यातच मान्सूनवर…; प्रशांत महासागराच्या तापमानात वाढ

उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा हाहा:कार; तीव्र वादळामुळे 62 जणांचा मृत्यू, अनेक जिल्ह्यांत वीजपुरवठा खंडित
2

उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा हाहा:कार; तीव्र वादळामुळे 62 जणांचा मृत्यू, अनेक जिल्ह्यांत वीजपुरवठा खंडित

अकोल्यातील तापमानात पुन्हा वाढ; पारा 45.6 अंशांवर, उन्हाचे बसत आहेत चटके
3

अकोल्यातील तापमानात पुन्हा वाढ; पारा 45.6 अंशांवर, उन्हाचे बसत आहेत चटके

Monsoon Update : 25 ते 27 मेदरम्यान केरळमध्ये दाखल होणार मान्सून, पाच राज्यांसाठी दिला ‘हा’ इशारा
4

Monsoon Update : 25 ते 27 मेदरम्यान केरळमध्ये दाखल होणार मान्सून, पाच राज्यांसाठी दिला ‘हा’ इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.