मुंबई – महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा पेटला आहे. मंगळवारी सीमावादावरुन कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला. दुपारच्या सुमारास कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावमधील हिरबागेवाडी टोलनाक्यावर महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला. तसेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेल्या कोगनोळी इथे महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करुन कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे. याचे राज्यात तीव्र पडसाद उमटले असून कर्नाटकच्या विरोधात आंदोलन करण्यात येत असून, संतप्त प्रतिक्रिया येताहेत.
[read_also content=”भाजपाला पराभूत करत दिल्ली पालिकेत आपने फडकवला झेंडा https://www.navarashtra.com/india/aap-won-delhi-municipality-defeating-to-bjp-351752.html”]
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) काल पत्रकार परिषद घेत 48 तासात हल्ले थांबले नाहीत तर मला बेळगावात जावे लागेल असं म्हटलं होतं. त्यानंतर कालच्या अल्टिमेटनंतर आज शरद पवारांनी सीमाभागत थेट फोन करुन तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला. मराठी एकिकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना शरद पवारांनी फोन करुन सद्य परिस्थितीचा आढावा जाणून घेतला. तसेच हल्ले थांबले की सुरु आहेत याची फोनवरुन शरद पवारांनी विचारपूस केली. दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीवरून आज अधिवेशात देखील याचे सीमावादाचे पडसाद उमटले. महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार (Shinde fadnavis government) सीमा प्रश्नासाठी मूग गिळून गप्प आहे, काहीच भूमिका घेत नसल्याचा आरोप केला जात असून, शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde fadnavis government) तसेच केंद्रातील भाजपावर टिका केली जात आहे.