
कापसाच्या दरवाढीचा फायदा व्यापाऱ्यांना! कवडीमोल विक्री, नंतर दरवाढ; शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान
विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना यंदा दरवाढीचा लाभमिळू शकलेला नाही. जीवनावश्यक गरजा आणि खर्च भागवण्यासाठी चांदूर बाजार तालुक्यातील शेतकर्यांसह अनेक शेतकऱ्यांनी कापूस ७१०० ते ७६०० रुपये प्रतिक्विंटल दराने विकला. दरम्यान, सध्या बाजारात कापसाचे दर ८ ते ८५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले असून या वाढीचा फायदा मात्र व्यापाऱ्यांनाच अधिक होत असल्याची शेतकऱ्यांची खंत आहे.(फोटो सौजन्य – istock)
अमरावतील ६२७ रुग्णांना ५.२८ कोटींची मदत! आरोग्यसेवेला मिळणार गती; मुख्यमंत्री निधीतून गरजूंना दिलासा
विदर्भातील पांढरे सोनं म्हणून ओळखले जाणारे नगदी पीक असलेल्या कापसाची काही प्रमाणात दरवाढ झाल्याचे दिसून येते. मात्र, आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे वाती करण्यासाठीही कापसाचे बोंड शिल्लक राहिले नाहीत. जीवनावश्यक गरजा भागविण्यासाठी चांदूर बाजार तालुक्यातील शेतकऱ्यांना कवडीमोल भावात कापसाची विक्री करावी लागली. यामुळे या दरवाढीचा फायदा व्यापाऱ्यांनाच अधिक होत आहे. ही नित्याची बाब झाली आहे. सध्या कापूसच नाही तर इतरही शेतमालाची दरवाढ म्हणजे वरातीमागून घोडे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
माधान, शिरजगाव कसबा, ब्राह्मणवाडा थडी, घाटलाडकी, करजगाव, शिरजगाव बंड परिसरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना यंदा मोठ्या आर्थिक फटक्याला सामोरे जावे लागले. कापसाच्या दरात सध्या वाढ झाली असली तरी बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस यापूर्वीच कमी दरात विकल्याने दरवाढीचा त्यांना कोणताही लाभ मिळालेला नाही.
जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी कवडीमोल भावात कापूस विकावा लागला. कापसाला हमीभावाची प्रभावी नियंत्रण आणि शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण राबविण्याची गरज व्यक्त होत आहे, दरवर्षी अशाच प्रकारे शेतकऱ्यांचे अंमलबजावणी, बाजारातील दर नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.कापूस साठवण्यासाठी अनेक अडचणी; कापूस साठवताना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, लहान घरांमध्ये जागेअभावी खोल्या कापसाने भरून जातात. याशिवाय अधिक काळ कापूस साठवून ठेवल्यास अंगाला खाज सुटते. त्यामुळे राहणीमानावर परिणाम होतो. उंदीर, कीड व आग लागण्याचा धोका असल्याने शेतकऱ्यांना दरवाढीची वाट पाहूनही अखेरीस कमी दरात कापूस विकला. या परिस्थितीमुळे बाजार व्यवस्थेतील पारदर्शकतेचा अभाव आहे.
खरीप हंगामात सुरुवातीला पावसाची स्थिती समाधानकारक असल्याने कापूस पिकाची वाढ चांगली झाली होती. मात्र, नंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे उत्पन्नात घट झाली. अनेक शेतांमध्ये केवळ दोन वेचणीत उलंगवाडी झाली. उत्पादन कमी झाल्याने दर वाढतील, या अपेक्षेने काही शेतकऱ्यांनी कापूस घरात साठवून ठेवला होता. मात्र, जानेवारी अखेरही बाजारात अपेक्षित दर मिळाले नाहीत.लग्नसराई, शेती व घरगुती खर्च भागवण्यासाठी शेतकऱ्यांना ७१०० ते ७,६०० रुपये प्रतिक्विंटल दराने कापूस विकावा लागला.मार्च एप्रिल महिन्यात कापसाच्या दरात वाढ होऊन सध्या ८ हजार ते ८,५०० रुपये प्रतिक्विंटल दर आहे.