Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोलापूरात दूषित पाण्यामुळे दोन शाळकरी मुलींचा दुर्दैवी मृत्यू; एकीची प्रकृती चिंताजनक

सोलापूरला सतत पाणी दूषित होण्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. दोन मुलींच्या मृत्यूमुळे सोलापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 05, 2025 | 03:12 PM
वसतिगृहात 15 वर्षीय मुलाचा मृत्यू; वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप

वसतिगृहात 15 वर्षीय मुलाचा मृत्यू; वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप

Follow Us
Close
Follow Us:

सोलापूर : सोलापूरच्या बाबासाहेब जगजीवन राम झोपडपट्टीत, दूषित पाण्याच्या संशयामुळे दोन शाळकरी मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर एका मुलींची प्रकृती गंभीर आहे. पीडित कुटुंबांनी आरोप केला की, त्यांच्या घरी पुरवठा होणारे दूषित पाणी पिऊन मुली आजारी पडल्या. स्थानिक रहिवाशांनी परिसरातील पाणीपुरवठ्याच्या गुणवत्तेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. याप्रकरणी आता सोलापूरकर चांगलेच आक्रमक झाले आहेत.

सोलापूरकरांनी पीडित कुटुंबाला न्याय देण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. वास्तविक, सोलापूरला सतत पाणी दूषित होण्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. दोन मुलींच्या मृत्यूमुळे आता सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भाग्यश्री म्हेत्रे (वय 16) आणि जिया म्हेत्रे (वय 16) असे या मृत मुलींची नावे आहेत.

सोलापूरमध्ये होणारे दूषित पाणी पुरवठ्यामुळे त्या आजारी पडल्या असल्याचा आरोप केला जात आहे. तर जयश्री महादेव म्हेत्रे (वय 18) ही मुलगी सध्या गंभीर असून रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत.

कर्मचाऱ्यांवर कारवाईबाबत आयुक्तांचे आश्वासन

या झोपडपट्टीमध्ये मागील काही दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार देवेंद्र कोठे यांनी देखील दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. महानगरपालिकेच्या याच हलगर्जीपणामुळे या मुलींचा मृत्यू झाला असल्याचा आरोप देखील आता केला जात आहे. त्यामुळे आता अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचे आश्वासन महानगरपालिका आयुक्तांनी दिले आहे. संबंधितांवर तातडीने कठोर कारवाई करून यावर उपाययोजना करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

Web Title: Two schoolgirls tragically die due to contaminated water in solapur nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2025 | 03:12 PM

Topics:  

  • Solapur News
  • water issues

संबंधित बातम्या

Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट
1

Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.