Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जठारवाडीत गॅस्ट्रो सदृश्य साथीचे दोन बळी

- गावाचा पिण्याचा पाणीपुरवठा थांबवण्याचे आरोग्य विभागाने दिले आदेश; कुपनलिकेव्दारे होणार पुरवठा

  • By Aparna
Updated On: Nov 13, 2022 | 02:22 PM
जठारवाडीत गॅस्ट्रो सदृश्य साथीचे दोन बळी
Follow Us
Close
Follow Us:

शिरोली : जठारवाडी ( ता. करवीर ) ग्रामपंचायतीला गावाचा पिण्याचा पाणीपुरवठा थांबवण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिले आहेत. आरोग्य विभागाने दोन दिवसांपूर्वी गावाच्या विविध भागातील पाण्याचे पाच नमुने तपासणीसाठी पाठविले होते. हे पाचही नमुने पिण्यासाठी अयोग्य असल्याचा अहवाल मिळाला आहे. त्यामुळे कुपनलिकेव्दारे गावाला होणारा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा तात्काळ बंद करण्याच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली. पर्यायी व्यवस्था म्हणून ग्रामपंचायतीने आरओ द्वारे मिळणारे पाणी उपलब्ध केले आहे. तसेच टँकरद्वारे येणाऱ्या पाण्यात टीसीएस पावडर टाकून ते पाणी देण्यात येत आहे.

गावात भीतीचे वातावरण
दरम्यान गॅस्ट्रो सदृश आजाराने आज सकाळी पहिला व सायंकाळी दुसरा बळी घेतला असल्याची चर्चा गावात आहे. हे दोन्ही मृत्यू गावातून बाहेर गेल्यानंतर झाले आहेत. यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बळवंत श्रीपती पाटील (वय ७०) व पोपट भानुदास जाधव (वय ३५) असे मृतांचे नाव आहे. बळवंत पाटील हे काल महे (ता.करवीर) येथे असणाऱ्या मुलीकडे भाजीपाला देण्यासाठी गेले होते. सायंकाळी जठारवाडीला परत येण्यासाठी घरातून बाहेर पडत असताना त्यांना उलटी झाली. त्यांनंतर त्यांना उलटी व जुलाब सुरू झाले. त्यामुळे मुलीने त्यांना बिडशेड येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

उपचार सुरू असताना शनिवारी ( ता. १२ ) सकाळी सहा वाजता त्यांचा मुत्यु झाला. साडेदहाच्या सुमारास त्यांचा मृतदेह जठारवाडीत आणण्यात आला. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर पोपट जाधव हे काल रात्री गावातील अन्य तरुणांसोबत प्रवासी बसने अनिरुद्ध बापूंच्या पादुका आणण्यासाठी मुंबईला गेले होते. आज सकाळी त्यांनाही अचानक जुलाब व उलटी सुरू झाल्याने त्यांच्या सोबत असणाऱ्या तरुणांनी त्यांना पनवेल येथील गांधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरु असताना सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला.

 आरोग्य विभागाची सहा पथके जठारवाडीत
काल रात्रीपासून बारा रुग्णांनी नव्याने उपचार घेतले. तर भुये प्राथमिक आरोग्य केंद्र व कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयात दाखल असणाऱ्या २६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आरोग्य विभागाची सहा पथके जठारवाडी गावात कार्यरत असून योग्य खबरदारी व उपाययोजना सुरू असल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होणार नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.  दिंडीतील वारकऱ्यांच्या मृत्यूनंतर अनेक लोकप्रतिनिधींनी जठारवाडी गावात भेट दिली. मात्र गॅस्ट्रो सदृश्य साथीच्या आजारात एकही लोकप्रतिनिधी जठारवाडीत फिरकलेला नाही. याबाबत ग्रामस्थांमधून खंत व्यक्त होत आहे.

Web Title: Two victims of gastro like epidemic in jatharwadi nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2022 | 02:22 PM

Topics:  

  • kolhapur
  • maharashtra
  • Shiroli

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
1

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा
2

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!
3

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!

महाराष्ट्रात वाघ आणि बिबट्यांचे हल्ले सुरूच, ३ वर्षांत १७,०४४ जणांचा मृत्यू, वाघांच्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक
4

महाराष्ट्रात वाघ आणि बिबट्यांचे हल्ले सुरूच, ३ वर्षांत १७,०४४ जणांचा मृत्यू, वाघांच्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.