मुंबई : राज्यात सत्तांतर होऊन आता चार साडेचार महिने झाले आहेत, महाविकास आघाडी सरकार कोसळून भाजप व एकनाथ शिंदे बंडाळी गट (BJP and Shinde Group) यांचे सरकार आले आहे. आणि मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Vice CM Devendra fadnvis) यांनी पदभार स्विकारला आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राज्यातील मोठमोठे प्रकल्प राज्याबाहेर गेल्यामुळं, वादग्रस्त वक्तव्य तसेच विविध मुद्दावरुन विरोधक सत्ताधारी शिंदे-फडणवीस यांच्यावर सडकून टिका करताना दिसत आहेत. तर याला प्रतिउत्तर म्हणून भाजपा व शिंदे गटातील नेते जोरदार प्रतिउत्तर देताहेत. यामुळं विरोधक आणि सत्ताधारी असा कलगीतुर रंगताना दिसतो. दरम्यान, शिवसेनेतून फुटून शिंदे गटात गेलेले नेते ठाकरे गटावर किंबहुना उद्धव ठाकरेंवर टिका करत आहेत.
[read_also content=”आत्मनिर्भर भारतासाठी स्त्रीशक्ती आत्मनिर्भर होणे गरजेचे, विद्यापीठांनी खऱ्या अर्थाने विश्व विद्यालय व्हावे – राज्यपाल https://www.navarashtra.com/maharashtra/for-a-self-reliant-india-women-power-needs-to-be-self-sufficient-governor-350822.html”]
दरम्यान, माजी मंत्री व आमदार बच्चू कडूंनी (Bachu Kadu) पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाना साधला आहे. उद्धव ठाकरेंनी महिला मुख्यमंत्री करणार असल्याची घोषणा केल्यानंतर त्यांच्यावर टिका होत आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याच मंत्रिमंडळातील मंत्री व आमदार बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरेंवर महिला मुख्यमंत्री यावरुन जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरेंना काही जमत नाहीय, तसेच त्यांच्याकडे आता काही काम उरलं नाही म्हणून त्यांनी नवीन उपक्रम सुरु केला आहे. अशी बोचरी टिका आमदार बच्चू कडू यांनी केली आहे.