शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत (फोटो- सोशल मिडिया)
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कायदा आणि सूव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला पाहायला मिळत आहे. परभणी आणि बीडमध्ये हिंसाचारच्या घटना घडल्या. त्याचे पडसाद नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात देखील उमटले. सध्या बीडमधील संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. त्यातच शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या 2 पुतण्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
नेमके प्रकरण काय?
शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्या 2 पुतण्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. त्यामुळे सर्वत्र एकच चर्चा सुरू झाली आहे. 2 पुतण्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन तुमचाही संतोष देशमुख करू असे सांगण्यात आले आहे. तुमचं देखील संतोष देशमुख करू अशी धमकी पत्राच्या माध्यमातून देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी धनंजय सावंत यांच्या घराबाहेर गोळीबाराची घटना घडली होती. अज्ञात लोकांनी ही धमकी दिली आहे. त्यानंतर तानाजी सावंत यांच्या 2 पुतण्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.
SP नवनीत कॅावत ॲक्शन मोडमध्ये
बीडमधील माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण हे अत्यंत गंभीर असून या प्रकरणाची एसआयटी चौकशी आणि न्यायालयील चौकशी केली जाईल. सध्या या प्रकऱणातील पोलीस एसपींची तत्काळ बदली करण्यात आली आहे, एवढ्यावरच न थांबता या प्रकरणातील पाळंमुळं खोदली जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. दरम्यान या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची ठेत उचलबांगडी केल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर आता नवनीत कॅावत यांची बीड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नवनीत कॅावत यांनी पदभार स्वीकारताच काही महत्वाचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा: संतोष देशमुख हत्या प्रकरण: SP नवनीत कॅावत ॲक्शन मोडमध्ये; म्हणाले, “बीडमधील परिस्थिती…”
बीडचे नवीन पोलीस अधीक्षक काय म्हणाले?
आयपीएस अधिकारी नवनीत कॅावत हे छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत होते. मात्र आता त्यांची नियुक्ती बीडच्या पोलीस अधीक्षकपदी करण्यात आली आहे. नियुक्ती होताच नवनीत कॅावत म्हणाले, सरपंच संतोष देशमुख प्रकरणात मी जातीने लक्ष घालणार आहे. जे कोणी आरोपी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. एक दोन दिवसांत मी पीडित कुटुंबाला भेट देणार आहे. लवकरच मी अधिकाऱ्यांची भेट घेऊन महत्वाचे निर्देश देणार आहे. बीड जिल्ह्यातील दहशत खपवून घेणार नाही. बीडमधील परिस्थिती नियंत्रणात आणणे हे माझे पहिले कर्तव्य आहे. नागरिकांनी भीतीच्या वातावरणात राहू नये. येत्या काही दिवसांत बीड जिल्हा गुन्हेगारी मुक्त करणार आहे. कोणत्याही आरोपीची गय केली जाणार नाही. बीड, परभणी घटनांमधील दोन्ही मृतांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. त्यानुसार बीडमध्ये हत्या झालेल्या सरपंच संतोष देशमुख आणि परभणी मधील घटनाक्रमात मृत सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांना ही दहा लाखांची मदत देण्यात येणार आहे.