कराड तालुक्याला अवकाळीचा तडाखा! गहू, ज्वारी अन् भाजीपाला पिकाला फटका
दरम्यान, गुरुवारी कराडचा आठवडी बाजार असल्याने बाजारपेठेत मोठी गर्दी होती. गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी आलेले नागरिक आणि भाजी विक्रेते अचानक आलेल्या पावसामुळे गोंधळून गेले. अनेकांनी माल झाकण्यासाठी धावाधाव केली, तर काहींना आसरा शोधावा लागला. ग्रामीण भागातही या पावसाचा फटका बसला. सध्या शेतकऱ्यांची शाळू व गहू काढणी सुरू असून, काही ठिकाणी वाळवण, कडबा बांधणी व गंजी लावण्याचे काम सुरू आहे. अशा वेळी आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाली.
Mumbai Press Club: मुंबई प्रेस क्लबला बॉम्बची धमकी, एका ईमेलमुळे मोठी खळबळ
तालुक्यातील काले, उंडाळे, येळगाव, वाठार रेटरे बुद्रुक परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. उंडाळे भागासह नांदगाव, कालवडे, कासारशिरंबे, बेलवडे बुद्रुक व वाठार परिसरात गारांचा वर्षाव झाला. या गारपिटीमुळे गहू, ज्वारी आणि भाजीपाला पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोडपून काढले असून, याचा मोठा फटका पुणे-सातारा महामार्गाला बसला आहे. हरिश्चंद्री गावाच्या हद्दीत वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे सेवा रस्त्यावरील सखल भागात कंबरे इतके पाणी साचले होते. येथे उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण झाला आणि मुख्य महामार्गावरील वाहतुकीवर याचा परिणाम झाला.
Maharashtra Rain Alert: अबब! आज घरातच थांबा; ‘या’ जिल्ह्यांना पाऊस धुवून काढणार, अलर्ट काय?
सुमारे तासभर चाललेल्या या पावसामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पाण्यातून मार्ग काढताना वाहनधारकांना कसरत करावी लागली, तर अनेक प्रवासी या कोंडीत अडकून पडले. पाऊस थांबल्यानंतर आणि पाण्याचा निचरा झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आली. मात्र, अचानक आलेल्या या संकटामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.






