
सिंचनासाठी २४ तास वीजपुरवठ्याची मागणी, माजी आमदार तिमांडे यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना साकडे
हिंगणघाट : खरीप हंगामात पावसाने दिलेल्या लांब खंडामुळे पिके मरणासन्न अवस्थेत आहे. शेतकऱ्यांना उपलब्ध सिंचनाच्या पाण्याचा उपयोग करून पिके वाचविता यावीत, यासाठी शासनाने सिंचनासाठी २४ तास अखंडित वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी माजी आमदार प्रा. राजू तिमांडे यांनी केली. याबाबत त्यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेत शेतकऱ्यांच्या विविध समस्यांचे निवेदन सादर केले.
खरीप हंगामात जून महिन्यात सुरुवातीला पाऊस लांबणीवर गेला. तर नंतर झालेल्या पावसामुळे पेरणीच्या कामाला शेतकऱ्यांनी गती दिली. मात्र, जुलै महिन्यात पावसाने लपंडाव केल्याने अनेक शेतकऱ्यांना दुबार तिबार पेरणी करावी लागली. पावसाच्या खंडामुळे कपाशीची लागवडही अपेक्षेप्रमाणे होऊ शकली नाही. तुरीच्या पिकालाही पावसाच्या अनियमिततेचा फटका बसला असून आता पुन्हा पावसाचा खंड कायम आहे. ऑगस्ट महिन्यातही १५ दिवसांपासून पावसाचा खंड कायम आहे. त्यामुळे पिकांची अवस्था गंभीर झाली आहे.
विशेषतः पठारी व मुरमाड जमिनीवरील पिके शेवटच्या घटका मोजत आहे. सोयाबीन पिकात फुलगळ होत आहे. त्यामुळे सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना २४ तास वीजपुरवठा देण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून त्यांनी उपमुख्यमंत्र्यांना केली आहे.
वर्धा. पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते आर्वी नाका येथे नवीन उभारण्यात आलेले ३१५ केव्हीचे रोहित्र व आरएमयूचे लोकार्पण करण्यात आले. तसेच म्हाडा कॉलनी येथे सुरू करण्यात आलेल्या शहरी आरोग्यवर्धिनी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
Wardha News : वर्ध्यात ३२ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ; पालकमंत्री पंकज भोयर यांची माहिती
यावेळी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंता स्मिता पारखी, कार्यकारी अभियंता नरेश पारधी, नगर परिषदेच्या बांधकाम सभापती राखी पांडे, नगरसेवक सतीश मिसाळ, उज्ज्वला पेठे, नीलेश किटे, वीज कंपनीचे कनिष्ठ अभियंता क्षितिज अंबाडकर तसेच आरोग्यवर्धिनी केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी माधुरी दिघेकरी आदी उपस्थित होते,
नवीन सुरू करण्यात आलेल्या रोहित्रामुळे म्हाडा कॉलनी व परिसरातील रोहित्रावर येणारा ताण कमी होऊन नागरिकांना अखंड वीजपुरवठा करणे सोईचे होणार असल्याचेही पालकमंत्री म्हणाले.