Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wardha News : वर्ध्यात ३२ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ; पालकमंत्री पंकज भोयर यांची माहिती

वर्धा जिल्ह्यातील ३२ हजार ५३५ शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री पंकज भोयर यांनी दिली. जिल्ह्यातील विविध विकासकामांचाही त्यांनी आढावा मांडला.

  • By विवेक
Updated On: Aug 17, 2026 | 06:13 PM
वर्ध्यात ३२ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ; पालकमंत्री पंकज भोयर यांची माहिती

वर्ध्यात ३२ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ; पालकमंत्री पंकज भोयर यांची माहिती

Follow Us
Follow Us:
  • वर्ध्यातील ३२ हजार ५३५ पात्र शेतकऱ्यांना ३१६ कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार.
  • पहिल्या टप्प्यात १० हजार ६३५ शेतकऱ्यांच्या खात्यात १०७ कोटी रुपये जमा करण्यात आले.
  • जिल्ह्यात २४ हजार घरकुलांना मंजुरी असून १० हजारांहून अधिक घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे.
 

वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेतून मोठा दिलासा मिळणार असल्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले. पोलिस मुख्यालयाच्या प्रांगणात पार पडलेल्या स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य सोहळ्यात ध्वजारोहणानंतर ते बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ३२ हजार ५३५ शेतकरी पात्र ठरले आहेत. या शेतकऱ्यांना एकूण ३१६ कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याची माहिती भोयर यांनी दिली. यापैकी पहिल्या टप्प्यात १० हजार ६३५ शेतकऱ्यांच्या खात्यात १०७ कोटी रुपये जमा करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वर्धा जिल्ह्यात मोठ्या विकासकामांना गती

जिल्ह्यात विविध क्षेत्रांमध्ये पायाभूत सुविधांच्या कामांना वेग देण्यात येत असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. पुलगाव येथे वर्धा नदीवर आणि आजनसरा येथे यवतमाळ-वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर प्रत्येकी ४० कोटी रुपये खर्चून मोठ्या पुलांचे बांधकाम सुरू आहे.

Wardha News: दीड लाख शेतकऱ्यांच्या पिकांना विमाकवच; कापूस, सोयाबीन, तुरीसह भुईमूग, ज्वारीचा समावेश

आंजी येथे २६ कोटी रुपये खर्चून ग्रामीण रुग्णालय, तर सेलू येथे ४७ कोटी रुपये खर्चून न्यायालयीन इमारतीचे बांधकाम करण्यात येत आहे. याशिवाय पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ५ कोटी ७१ लाख रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे भोयर यांनी सांगितले.

२४ हजार घरकुलांना मंजुरी; १० हजार घरे पूर्ण

प्रधानमंत्री आवास योजनेसह विविध योजनांमधून वर्धा जिल्ह्यासाठी २४ हजार घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी १० हजारांहून अधिक घरांचे बांधकाम पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली.

घरकुलासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे पात्र लाभार्थी योजनेपासून वंचित राहू नयेत, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. शासकीय जागा उपलब्ध करून देण्यासोबतच गरज भासल्यास जागा खरेदीसाठी अनुदान देण्याची तरतूद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

१ लाख ४१ हजार महिलांना ‘लखपती दीदी’ बनविण्याचा दावा

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी जिल्ह्यात ‘लखपती दीदी’ उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात आल्याचेही पंकज भोयर यांनी सांगितले. स्वयंसहायता समूहांशी जोडलेल्या १ लाख ४१ हजार महिलांचे आर्थिक उत्पन्न वाढवून त्यांना लखपती दीदी बनविण्याचे काम करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

Wardha News : सोयाबीनचे पंचनामे रखडल्याने शेतकरी संतप्त; कृषी अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार अर्पण करून निषेध

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात पालकमंत्र्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिक आणि देशभक्तांना अभिवादन केले. स्वातंत्र्यानंतर देशाला विकासाच्या मार्गावर नेणे हे मोठे आव्हान होते; मात्र देशासोबत महाराष्ट्रही वेगाने प्रगती करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Wardha 32000 farmers loan waiver pankaj bhoyar independence day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 06:13 PM

Topics:  

  • Farmer Loan Waiver
  • wardha
  • wardha News

संबंधित बातम्या

Buldhana News:कर्जमुक्ती योजना; पालकमंत्र्यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा, नुकसानीचे पंचनामे अचूक व वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश
1

Buldhana News:कर्जमुक्ती योजना; पालकमंत्र्यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा, नुकसानीचे पंचनामे अचूक व वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश

Wardha News: दीड लाख शेतकऱ्यांच्या पिकांना विमाकवच; कापूस, सोयाबीन, तुरीसह भुईमूग, ज्वारीचा समावेश
2

Wardha News: दीड लाख शेतकऱ्यांच्या पिकांना विमाकवच; कापूस, सोयाबीन, तुरीसह भुईमूग, ज्वारीचा समावेश

Wardha News : वर्ध्यात अंगणवाडी सेविका-मदतनिसांचा जेलभरो; 30 हजार वेतनासह विविध मागण्यांसाठी सरकारविरोधात एल्गार
3

Wardha News : वर्ध्यात अंगणवाडी सेविका-मदतनिसांचा जेलभरो; 30 हजार वेतनासह विविध मागण्यांसाठी सरकारविरोधात एल्गार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.