
धावत्या GT एक्सप्रेसच्या डब्याला भीषण आग
Wardha Train Fire News IN Marathi: वर्धा-सिंधी रेल्वे स्थानकाजवळ जीटी एक्सप्रेसच्या एका डब्यात अचानक आग लागली. ‘ग्रँट ट्रंक एक्सप्रेस’ (नवी दिल्ली–चेन्नई) या गाडीला आग लागल्याचं समोर आलं. रेल्वे प्रशासनाने तात्काळ मदत करत ट्रेन थांबवली आणि प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले. ही आग पार्सलच्या डब्यात लागली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र या आगीत संपूर्ण डबा जळून खाक झाल. प्रवाशांना वेळीच बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. प्राथमिक माहितीनुसार, कोणताही प्रवासी जखमी झाला नाही. डॉक्टरांची एक टीम आणि आपत्कालीन पथक घटनास्थळी पोहोचले. पार्सलचा डबा मागे ठेवून ट्रेन पुढे निघाली आहे.
सुदैवाने या घटनेन कोणताही प्रवासाला इजा नाही झाली, अशी माहिती मिळत आहे. घटनास्थळी डॉक्टरांची टीम आणि आपत्कालीन पथक दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आहे. आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास सुरू आहे. सुरुवातीला ही आग पार्सल कोचला लागली होती. त्यानंतर ही आग पसरल्यामुळे गार्डच्या डब्यापर्यंत ही आग गेली. ही ट्रेन तुळजापूरजवळ थांबवण्यात आली आहे. काही लोक या आगीत जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र थोडक्यासाठी जीवितहानी टळली आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र बोगीचं मोठं नुकसान झालं आहे.
आग लागलेला डबा मुख्य रचनेपासून वेगळा करण्यात आला. अग्निशमन दलाच्या मदतीने आग विझवण्यात आली. सुमारे एक तासाच्या प्रयत्नानंतर परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु धुरामुळे काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली, असे सूत्रांनी सांगितले.
आगीमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक अंदाजानुसार, विद्युत यंत्रणेतील बिघाडामुळे आग लागली असण्याची शक्यता आहे. रेल्वे प्रशासनाने घटनेची चौकशी सुरू केली आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, आग विझवल्यानंतर जीटी एक्सप्रेस पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली.या घटनेमुळे काही काळ रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. नागपूर मार्गावरील काही गाड्यांचे वेळापत्रकही उशिराने सुरू असल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले.
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, रेल्वे प्रशासनाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. या घटनेमुळे काही गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, मोठी दुर्घटना टळल्याने प्रवासी आणि रेल्वे प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे.