Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठवाड्यात पाणी टंचाई, भूजल पातळीमध्ये घट झाल्याने ५१ तालुक्यांवर पाणी संकट

राज्यभरात सगळीकडे उन्हाळा वाढला आहे. या वाढत्या तापमानाचा फटका राज्यातील अनेक तालुक्यांना आणि गावांना बसला आहे. सगळीकडे पाणी टंचाईचे संकट आले आहे. राज्यात सगळीकडे निवडणुकांचे वातावरण आहे तर दुसरीकडे ग्रामीण भागातील गावांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 08, 2024 | 01:46 PM
मराठवाड्यात पाणी टंचाई, भूजल पातळीमध्ये घट झाल्याने ५१ तालुक्यांवर पाणी संकट
Follow Us
Follow Us:

राज्यभरात सगळीकडे उन्हाळा वाढला आहे. या वाढत्या तापमानाचा फटका राज्यातील अनेक तालुक्यांना आणि गावांना बसला आहे. सगळीकडे पाणी टंचाईचे संकट आले आहे. राज्यात सगळीकडे निवडणुकांचे वातावरण आहे तर दुसरीकडे ग्रामीण भागातील गावांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. मराठवाड्यात पाणी टंचाई निर्माण झाल्याने सगळीकडे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. नागरिकांना भटकंती करून पाणी आणावे लागत आहे. एक हंडा पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. तसेच येणाऱ्या पुढील १० दिवसांमध्ये पाणी टंचाईत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

उन्हाचा कडाका सगळीकडे मोठ्या प्रमाणवर जाणवत आहे. मराठवाड्यातील ग्रामीण भागात भूजल पातळीमध्ये दिवसेंदिवस घट होत चालल्याने ५१ तालुक्यावर भीषण पाणी संकट आले आहे. त्यामुळे सध्या मराठवाड्यात टँकरने पाणी आणावे लागत आहे. टँकरची संख्या १ हजारच्या पार गेली आहे. तसेच पुढील काही दिवसांमध्ये ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. तापमानात वाढ झाल्याने सगळीकडे पाणी टंचाई जाणवत आहे. मराठवाड्यातील ७६ पैकी ५१ तालुक्यात भूजल पातळीवर त्याचा परिणाम झाला आहे. तर सर्वाधिक भूजल पातळी परभणीमध्ये २.२८ मीटर झाली आहे. परभणीच्या खालोखाल लातूरमध्ये भूजल पातळीमध्ये घट झाली आहे. तसेच ही परिस्थिती आणखीन गंभीर होण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यातील कोणत्या जिल्ह्यात किती टँकर?

छत्रपती संभाजीनगर : ४४३
बीड : ११७
जालना : ३२१
लातूर : ८
धाराशिव : ६३
परभणी : १

मराठवाड्यात यंदा कमी पाऊस झाल्याने अनेक भागात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे त्या भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, लातूर, धाराशिव, परभणी जिल्ह्यांमध्ये १ हजार टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील ६३९ गाव आणि १७० वाड्यांना टँकरने पाणीपुवठा केला जात आहे. राज्यामध्ये येत्या काही काळात भीषण पाणी टंचाई वाढण्याची शक्यता आहे. तर शहरी भागात पाणीपुरवठा कमी प्रमाणात केला जात आहे.

Web Title: Water shortage in marathwada water crisis in 51 taluks due to decrease in ground water level maharashtra marathawada nrsk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2024 | 01:46 PM

Topics:  

  • LOKSABHA ELECTION
  • maharashtra
  • Water Shortage

संबंधित बातम्या

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल
1

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान
2

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा
3

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती
4

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.