
सावंतवाडी टर्मिनसचे काम अपूर्णच
मूळ ठरावानुसार अंमलबजावणीची रेल्वे प्रवासी संघटनेची मागणी
तातडीची गरज म्हणून मूळ ठरावात केला बदल
सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे काम अद्यापही मूळ आराखड्याप्रमाणे पूर्ण झालेले नाही. केवळ क्रिमान आवश्यक कामे करून प्रवाशांची बोळवण करण्यात आली आहे. त्यामुळे २०१४ च्या मूळ बोर्ड रिझोल्यूशननुसार (Sindhudurg) या टर्मिनसची उर्वरित कामे २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात समाविष्ट करून पूर्ण करावीत, अशी आग्रही मागणी कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी यांनी केली आहे.
या संदभांत संघटनेचे उपाध्यक्ष सागर तळवडेकर यांनी कोकण रेल्वे महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांना निवेदन पाठवले आहे. डिसेंबर २०१४ मध्ये कोकण रेल्वेच्या संचालक मंडळाने सावंतवाडी स्थानकाचे ‘प्रवासी टर्मिनस’ मध्ये रूपांतर करण्यासाठी २१.२१ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती.
यात दोन नवीन खूप लाईन्स, हाय-लेव्हल आयलंड प्लॅटफॉर्म, वॉशेबल ऍप्रनसह स्वतंत्र स्टेबलिंग लाईन, नवीन पादचारी पूल आणि आरओबी या सुविधांचा समावेश होता. मात्र, प्रशासनाने तत्कालीन तातडीची गरज म्हणून मूळ ठरावात बदल केला आणि केवळ ११.४२ कोटी रुपये साचून एक तूप लाईन व प्लॅटफॉर्म क्रमांक ३ चे काम पूर्ण केले. यामुळे सावंतवाडीला पूर्ण क्षमतेचे टर्मिनस मिळण्याचे स्वप्न अद्याप अधुरेच आहे.
मूळ आराखड्यातील तिस-या रुळाचे (लूप लाईन) काम त्वरित हाती घ्यावे. टर्मिनस इमारत स्थानकाच्या पूर्व बाजूला सुसज्ज टर्मिनस इमारत उभारण्यात यावी, गाडांमध्ये पाणी भरण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात यावी. हे टर्मिनस पूर्ण क्षमतेने विकसित झाल्यास येथून मुंबई, पुणे यासारख्या शहरासाठी थेट रेल्वे सुरू करणे शक्य होईल. प्रलंबित प्रश्नाकडे लक्ष वैधताना कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने या सुविधांमुळे पर्यटक, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना मोठा दिलासा मिळाल्याचे पत्रात नमूद केले आहे. दरम्याब केवळ किमान आवश्यक कामे करणे हे तात्पुरते समाधान असू शकते, पण ते अंतिम उद्दिष्ट नाही. २०२६-२७ध्या कॅपिटल बजेटमध्ये तरतूद करून सावंतवाडीला पूर्ण क्षमतेचे टर्मिनस बनवावे , अशी अपेक्षा कोकण रेल्वे प्रवासी संघटनचे उपाध्यक्ष सागर तळवडेकर यानी व्यक्त केली.
Kokan Railway: कोकणवासियांसाठी खुशखबर! ‘या’ गाड्यांना कणकवली,सिंधुदुर्गात मिळणार थांबा
कोकणवासियांसाठी खूशखबर!
होळी आणि शिमग्यासाठी मोठ्य संख्येने कोकणात प्रवास करतात. याचपार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने कोकणासह देशभरात जाणाऱ्या विशेष 186 गाड्या सुरु करणार आहेत. त्यापैकी 94 ट्रेन होळीसाठी विशेष असतील आणि 94 नियमित ट्रेन असतील. या विशेष गाड्यांसाठी तिकीट बुकिंग १८ फेब्रुवारीपासून सुरू होईल. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “एआरपीनंतरच्या प्रवासांसाठी बुकिंग लागू असलेल्या संबंधित पुढील एआरपी तारखांना सुरू होईल. सामान्य शुल्कात यूटीएस प्रणालीद्वारे अनारक्षित डबे बुक करता येतील. प्रवासी तिकीट बुकिंगसाठी रेलवन अॅप देखील डाउनलोड करू शकतात.”
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.