
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
एक असा चित्रपट जो शंभर वर्षांहून अधिक काळ देशाला आणि येथील तरुणांना गुंतवून ठेवणाऱ्या प्रश्नांना विचारण्याचे धाडस करतो. राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक अभिजीत मोहन वारंग यांच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या ‘आखरी सवाल’ची झलक प्रदर्शित झाली आहे. यात संजय दत्त मुख्य भूमिकेत दिसणार असून निर्मिती निखिल नंदा यांनी देखील यामध्ये काम केले आहे.
महात्मा गांधी यांच्या निधनानंतर लावण्यात आलेल्या बंदीपासून ते बाबरी मशीद पाडल्याच्या आरोपांपर्यंत, ‘आखरी सवाल’ असे गंभीर प्रश्न उपस्थित करते ज्यांची उत्तरे लोक दीर्घकाळ शोधत आहेत. धाडसी आणि स्पष्ट मांडणी करणारी ही झलक इतिहासाच्या खोलात उतरते आणि संपूर्ण देशात नवी चर्चा निर्माण करणारी कथा मांडते.
स्वामींच्या कृपेने ‘सनई चौघडे’चा पहिल्याच आठवड्यात दबदबा; टॉप 10 मध्ये मालिकेने मिळवले स्थान
संजय दत्त यांच्यासोबत अमित साध, नमाशी चक्रवर्ती, समीरा रेड्डी, नीतू चंद्रा आणि त्रिधा चौधरी यांसारख्या कलाकारांनी सजलेला ‘आखरी सवाल’ हा प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा विषय ठरला आहे. निर्मात्यांनी हनुमान जन्मोत्सवाच्या शुभमुहूर्तावर (२ एप्रिल, सकाळी ११:११ वाजता) ही झलक प्रदर्शित केली असून ती सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. ही बहुप्रतीक्षित झलक चित्रपटाच्या विषयाची प्रभावी झलक दाखवते. देशाला पाहण्याची गरज असलेल्या दडलेल्या कथांच्या स्तरांना उलगडण्याचा प्रयत्न यात दिसतो. थेट आणि संवादात्मक शैलीतील ही झलक चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आणखी मोठी चर्चा निर्माण होईल अशी अपेक्षा आहे.
चित्रपटाची कथा ही विक्कीच्या पात्राभोवती फिरते आहे, जो हुशार पण थोडा तापट स्वभावाचा संशोधक आहे आणि प्रगत भारताचे स्वप्न पाहणारा महत्वाकांक्षी तरुण आहे. त्याचा संशोधन प्रबंध नाकारल्यानंतर तो आपल्या मार्गदर्शक प्राध्यापक गोपाल नडकर्णी यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप करतो. सुरुवातीला शैक्षणिक वाद असलेला हा विषय पुढे राष्ट्रीय दूरचित्रवाणीवरील चर्चेत बदलतो. चित्रपट भारतातील तरुणांच्या मनात निर्माण होणारे प्रश्न, त्यांची आशा, शंका आणि इतिहासातील घटनांमधून सत्य शोधण्याची धडपड दाखवण्यात आली आहे
‘आखरी सवाल’च्या कथानकाचा गाभा गुरु-शिष्य यांच्यातील संघर्षावर आधारित आहे. विक्कीची सततची प्रश्नांची मालिका एका खोल वैयक्तिक सत्याचा उलगडा करते. अखेरीस तो विचारलेला ‘आखरी सवाल’ शतकभर जुन्या गुपितावर प्रकाश टाकतो जे प्राध्यापकांना योग्य ठरवू शकते किंवा दोघांच्याही आयुष्याला कलाटणी देऊ शकते.
दिग्दर्शक अभिजीत मोहन वारंग यांनी २०२१ मध्ये ‘पिकासो’ या मराठी चित्रपटातून दिग्दर्शनाची सुरुवात केली होती आणि त्यासाठी त्यांना ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये विशेष उल्लेखही मिळाला होता. ‘डेजा वू’, ‘प्रेम प्रथा धूमशान’, ‘पिकोलो’ आणि ‘वर्चुअल रियलिटी’ यांसारख्या प्रकल्पांमधून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
‘निखिल नंदा मोशन पिक्चर्स’च्या बॅनरखाली साकारलेला हा चित्रपट निखिल नंदा सादर करत आहेत. चित्रपटाचे सहनिर्माते पुनीत नंदा, डॉ. दीपक सिंह, गौरव दुबे आणि उज्ज्वल आनंद आहेत. कथा, पटकथा आणि संवाद उत्कर्ष नैथानी यांनी लिहिले असून, संगीत मॉन्टी शर्मा यांनी दिले आहे, तर गीतलेखन कुमार विश्वास यांनी केले आहे. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद उत्कर्ष नैथानी यांनी लिहिले आहेत. संगीत मोंटी शर्मा यांनी दिले असून गीतलेखन कुमार विश्वास यांनी केले आहे. ‘आखरी सवाल’ ८ मे २०२६ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे