
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकरने नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये काम केले आहे. तिने तिच्या कामातून प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केले आहे. अमृताने केवळ मराठीतच नव्हेतर हिंदीतही महत्त्वपूर्ण भूमिका साकारत हिंदी प्रेक्षकांचीही मनं जिंकली आहेत. अमृता नेहमी सोशल मीडियावर तसेच मुलाखतींमधून तिच्या व्यावसायिक खाजगी आयुष्याबद्दल मनमोकळेपणाने बोलत असते.अलिकडेच तिने एका मुलाखतीत तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल भाष्य केले आहे. भारती सिंहला दिलेल्या मुलाखतीत अमृताने तिच्या खाजगी आयुष्याबद्दल सांगितले आहे. अमृताने या मुलाखतीत तिच्या आणि हिमांशू मल्होत्राच्या लग्नाबद्दल सांगितले आहे.
या मुलाखतीत अमृताला तुझ्या लग्नाला 15 वर्ष झाली असतील ना असं प्रश्न विचारण्यात आला. असं विचारल्यानंतर ती म्हणाली, ”जास्त झाली असतील.
एका वेळेनंतर असं वाटते की का केलं लग्न? तेव्हा लग्नाच्या वेळी इतकी पैसे खर्च केले त्याची बचत करायला पाहिजे होती. उगाच पैसे खर्च केले आहे. असं मला वाटतं.” लग्नात केलेल्या खर्चाबद्दल अमृताने पुढे सांगितले, लग्नात मोठा खर्च झाल्यामुळे आता थोडा पश्चाताप वाटतो, कारण त्या पैशातून घर खरेदी करता आले असते. सध्या ती आणि तिचे पती हिमांशू याबाबत विचार करत असल्याचेही तिने नमूद केले. यावर भारतीने स्वतःच्या लग्नाचा अनुभव शेअर करत सांगितले की, तिच्या लग्नात कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालायचे हे आधीच पत्रिकेत लिहिलेले होते. हळदीसाठी पिवळे आणि मेहंदीसाठी हिरवे कपडे अशी खास व्यवस्था करण्यात आली होती. दोघींच्या या संवादामुळे लग्नातील खर्च, नियोजन आणि परंपरा याबाबत सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
भारतीचे म्हणणे ऐकल्यानंतर ती पुढे म्हणाली, “हे सगळं आम्ही नाही केलं. त्यानंतर आम्ही ‘नच बलिये’मध्ये पैसे पण कमावले, नाव पण कमावलं सगळं काही आहे. पण, तरी लग्नात जो खर्च झाला ना त्याचा पश्चाताप होतो; कारण कलाकार आहोत, आमच्याकडे नेहमीच काम असतं असं होत नाही.” अमृताला पुढे तिच्या ‘तस्करी’ या नुकत्याच आलेल्या वेब सीरिजबद्दल विचारलं. भारती याबद्दल म्हणाली, तस्करी तर हिट झाली. यावर अमृता म्हणाली, “हो हिट झाली.” सध्या सोशल मीडियावर अमृताच्या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे.