(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार तीन दशकांहून अधिक काळ चित्रपटसृष्टीत आपला दबदबा राखत आहेत. नुकतच त्याचा‘जॉली एलएलबी 3’ चित्रपट रिलीज झाला, ज्याला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. या चित्रपटात त्याच्याबरोबर अर्शद वारसी, अमृता रान महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाला प्रेक्षक भरभरून प्रेम देताना दिसत आहेत. अक्षय कुमार त्याच्या चित्रपटामुळे किंवा त्याच्या व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत नाही, तर त्याच्या मुलाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे.
अक्षयचा मुलगा आरव अजूनही चित्रपटांच्या दुनियेतून दूर आहे आणि त्याने स्वतःच्या करिअरची वेगळी वाट धरली आहे. अक्षय कुमार हा त्याच्या फिटनेस आणि शिस्तबद्ध जीवनशैलीसाठी लोकप्रिय आहे. आता त्याच्या मुलांना शिस्त लावण्यात त्याचा किती वाटा आहे, त्याचे मुलांबरोबर कसे बॉण्डिंग आहे याबद्दल अभिनेत्याने वक्तव्य केले.
दिल्लीतील रामलीलामध्ये Bobby Deol करणार रावणाचा वध
अक्षयने सांगितलं की आरव १५ वर्षांच्या वयात शिक्षणासाठी लंडनला गेला. सध्या २३ वर्षांचा आरव चित्रपटांऐवजी फॅशन क्षेत्रात काम करायला इच्छुक आहे. अक्षय म्हणाला, “त्याने मला स्पष्ट सांगितलंय की तो चित्रपटात यायचं नाही. मी त्याला माझ्या प्रोडक्शन कंपनीचे काम सांभाळण्याचं सांगितलं, पण त्याला फॅशन डिझायनर व्हायचंय.”
अक्षयने पुढे सांगितले, “मी माझ्या मुलाचा मित्र आहे. तो २३ वर्षांचा आहे. तो लवकर मोठा झाला. तो सध्या शिक्षण घेत आहे आणि अभ्यास करण्यात व्यग्र आहे. त्याला कोणत्याही वाईट सवयी नाहीत. तो ट्विंकलसारखा आहे, कारण ट्विंकलसुद्धा सतत अभ्यास करत असते.”
‘वडापाव’च्या टीमसाठी साकारला भव्य वडापाव, हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थी व शेफ्सची कमाल पाककृती!
अक्षयने आरवच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याच्यासाठी एक पत्र लिहिले होते. त्याबद्दल अभिनेता म्हणाला, “तुझे वडील चित्रपटात अनेक सीनमध्ये पळत असतात. मी शूटिंगदरम्यानसुद्धा खूप पळत असतो, पण या सगळ्यात संयम महत्त्वाचा आहे. आयुष्यातील प्रत्येक गोष्ट काही क्षणात घडत नाही, तुला प्रत्येक गोष्ट पटकन मिळणार नाही.”
अक्षयच्या मुलाबद्दल बोलायचे तर तो वयाच्या १५ व्या वर्षी शिक्षणासाठी लंडनला गेला आहे. सध्या तो लंडनमध्ये फॅशन डिझाइनमध्ये कोर्स पूर्ण करत आहे.